AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही आधी मुख्यमंत्री पदाबाबत बोललो नाही, कारण…’, काय म्हणाले अजितदादा

राज्यात विधानसभेचा निकाल लागून तब्बल पाच दिवस झालेले आहेत तरी राज्याचे मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार आहे याचा निकाल लागलेला नाही. काल एकनाथ शिंदे यांनी भाजप नेतृत्व जो निर्णय घेईल हे मान्य केल्याने मुख्यमंत्री पद भाजपालाच मिळणार हे स्पष्ट झालेले आहे. अजितदादांनी एनडीएच्या बैठकीसाठी आज गुरुवारी दिल्ली गाठली आहे.

'आम्ही आधी मुख्यमंत्री पदाबाबत बोललो नाही, कारण...', काय म्हणाले अजितदादा
| Updated on: Nov 28, 2024 | 6:59 PM
Share

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार यावर सस्पेंस कायम असताना एनसीपीचे प्रमुख अजितदादा पवार यांनी बहुप्रतिक्षित एनडीएच्या बैठकीला हजर राहाण्यासाठी गुरुवारी दिल्ली गाठली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीचे तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे आणि अजित पवार गुरुवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी एनसीपीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.यावेळी ते म्हणाले की आम्ही राज्याला पुढे कसे न्यायचे, स्थानिक स्वराज्य संस्थात सत्ता कशी आणायची तसेच महिला आणि तरुणांना सशक्त कसे बनवायचे याच्या विषयावर चर्चाविनिमय आहे. लोकसभेत आम्हाला चांगले सर्मथन मिळले नाही, तरी आम्ही निराश झालो नाही. विधानसभेत चांगली कामगिरी करण्यासाठी मेहनत घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

ईव्हीएमबाबत टोला

ईव्हीएमवरील महाविकास आघाडीचे आरोप फेटाळत अजितदादा म्हणाले की यात काही तथ्य नाही. एनडीएच्या बैठकी आधी अजितदादा म्हणाले की त्यांना जेव्हा लोकसभेला जास्त जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम बरोबर होते. विधानसभेत निकाल निराळा लागला तर ईव्हीएमला दोष देणे बरोबर नाही, पंजाब,तेलंगणा आणि कर्नाटकात अनेक राज्यात विरोधक सत्तेत आहेत असा टोला अजितदादांनी यावेळी लगावला

 राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळवणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्याचा इरादा असल्याचे अजितदादांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता.यासाठी आम्हाला सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. आम्ही लढू आणि यश मिळवू. असली ( एनसीपी ) नकलीचा आता काही प्रश्न नाही. सर्वांना निवडणूक आयोगाने चिन्हं दिलेले आहे’.

मुख्यमंत्री कोण होणार ?

मुख्यमंत्री कोण होणार ? या प्रश्नाला उत्तर देताना अजितदादा म्हणाले की आम्ही निवडणूकीपूर्वी केव्हाच या विषयावर चर्चा केली नाही की मुख्यमंत्री कोण होणार ? आमची प्राथमिकता सत्तेत येण्यावर होती. आम्ही आधी मुख्यमंत्री पदावर चर्चा यासाठी केली नाही, कारण यामुळे आमच्या निवडणूकांच्या निकालांवर परिणाम होऊ शकला असता.आता आम्ही भाजपा नेतृत्वाला भेटू आणि यावर चर्चा करु असेही ते म्हणाले.

सस्पेन्स कायम

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सस्पेन्स कायम आहे. तिन्ही पक्षांनी एकजूट दाखवत या प्रश्नावर शांतता पाळली आहे.एकीकडे भाजपाला मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता असताना इतर दोन्ही पार्टीना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागणार आहे.आधीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्या नुसारच हे होत आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे यांनी भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल ते आपल्याला मान्य असल्याचे म्हटलेले आहे.

Follow Us