AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…नाहीतर जनतेच्या न्यायालयात जावं लागेल, पुढील सुनावणीत काय होणार, उल्हास बापट स्पष्टच सांगितलं…

पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर 21 फेब्रुवारीला ही सुनावणी होणार आहे. आता येणारा निर्णय महाराष्ट्रासाठीच बंधनकारक राहील. यांसह विविध मुद्द्यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी मत मांडलं आहे.

...नाहीतर जनतेच्या न्यायालयात जावं लागेल, पुढील सुनावणीत काय होणार, उल्हास बापट स्पष्टच सांगितलं...
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 17, 2023 | 12:09 PM
Share

पुणे : सलग तीन दिवस सुनावणी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या ( Maharashtra News ) सत्तासंघर्षाचा निकाल चौथ्या दिवशी जाहीर होईल अशी शक्यता होती, मात्र, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) मंगळवारी म्हणजेच 21 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणीत ठेवली आहे. त्यामुळे पुन्हा हा निकाल काही दिवस लांबणीवर पडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचा सस्पेन्स वाढतच चालला आहे. सलग तीन दिवस झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच खंडीपाठासमोरच दोन्ही गटाचा युक्तिवाद पार पडला आहे.

त्यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हंटलय, सात न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेतली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामध्ये आता पुढील सुनावणी सुद्धा पाच खंडपीठासमोरच होणार असल्याचे दिसून येत आहे.

पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर 21 फेब्रुवारीला ही सुनावणी होणार आहे. आता येणारा निर्णय महाराष्ट्रासाठीच बंधनकारक राहील. यामध्ये सुप्रीम कोर्टला ठरवावे लागेल की पक्ष सोडला तर काय ? अपात्र होतात का त्याचा अर्थ शोधावा लागेल.

त्यानंतर दोन तृतीयांश लोक एकाच वेळी गेले तर चालतील का ? की हळूहळू गेले तर चालतील का ? हे ठरवावे लागेल. स्वखुशीने पक्ष सोडला तर त्याचे काय हे सुद्धा ठरवावे लागेल. दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल का ? हे सुद्धा शोधावा लागणार आहे.

विधानसभेच्या अध्यक्षांचे अधिकार काय आहेत ? अविश्वासाचा ठराव आल्यावर काय करावा लागेल. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या सुचनेवरुन काम करायला हवे ते झालेले नाहीत त्यामुळे तीन चार सुनावण्या एकत्र होऊ शकतात.

त्यात सध्या ज्या खंडपीठासमोर युक्तिवाद सुरू आहे. त्यातील काही न्यायाधीश हे निवृत्त होणार आहे. त्यामुळे 15 मे च्या आधी हा निकाल लागण्याची शक्यता आहे. याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील लागणार आहे.

संपूर्ण भारताचा निकाल नाहीतर आत्ता हातात असलेल्या केसचा निकाल लावायचा ही बाब कोर्टाने म्हंटली आहे. त्यामुळे हा निकाल महाराष्ट्रा पुरता निकाल असणार आहे. किहोटा आणि रेबिया प्रकरणात वेगवेगळे भाग आहेत.

रेबिया आणि किहोटा प्रकरणातील काही मुद्दे हे शिंदे गटाच्या बाजूने आहे आणि काही मुद्दे हे ठाकरे गटाच्या बाजूने आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे वकील त्यांची बाजू मांडत आहे. त्यामुळे आपली बाजू कशी बरोबर हेच सांगितले जात आहे.

निकाल लागत नाही तोपर्यंत हेच सरकार राहणार. निकाल कुणाच्या बाजूने लागतो त्यावर अवलंबून राहणार आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागला तर सरकार कार्यकाळ पूर्ण करेल.

16 आमदार अपात्र झाले तर राज्यपाल बहुमत सिद्ध करण्याची संधी आहे का बघेल, बहुमत सिद्ध करण्याची संधी असेल तर सिद्ध करू देतील. अन्यथा शेवटी राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपाल शिफारस करतील. त्यानंतर थेट जनतेच्या न्यायालयात निकाल लागेल. म्हणजे निवडणुका होतील असं उल्हास बापट यांनी म्हंटलं आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?