AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा अन् शिंदे राजकारणात नसते तर काय बनले असते? मुख्यमंत्री फडणवीसांचं भन्नाट उत्तर

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.

अजितदादा अन् शिंदे राजकारणात नसते तर काय बनले असते? मुख्यमंत्री फडणवीसांचं भन्नाट उत्तर
देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 12, 2026 | 8:09 PM
Share

करवीर निवासिनी अंबाबाई आणि दख्खनच्या जोतिबाला नमन करतो, मी दोन वेळा नगरसेवक होतो, नागपूरचा महापौर देखील होतो. ज्याने पाप केलं तो नगरसेवक आणि महापाप केलं तो महापौर असतो. कारण शहरात कुठं काहीही झालं की पहिला नगरसेवक आणि नंतर महापौर यांना विचारलं जातं. जे सेवक म्हणून पाहिलं तर योग्य ठरतं, माझ्या शिवाय वार्डातून सुई देखील हलवता येणार नाही ही जी काही नगरसेवकांची मानसिकता असते ती  चुकीची आहे.  शहराचं नियोजन आधी फारसं होत नव्हतं, परंतु ग्रामीण भागातून नागरिक शहरात येत राहिले. संख्या वाढत राहिल्याने अव्यवस्था निर्माण झाली. सर्वात आधी मोदींनी शहराला निधी देण्यास सुरुवात केली, सर्व सुविधा शहरात असल्याने लोक शहरात येऊ लागले. मोदींनी शहरांसाठी अनेक योजना आणल्या असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  कोल्हापूर शहरात भेडसावणारे मुद्दे या पाच वर्षात आपण सोडवू शकतो. पर्यावरण, जल शुद्धीकरण आणि हवा प्रदूषण हे प्रश्न सोडवावे लागणार आहेत.  पूर्वीपासून हे सर्व क्षमता असलेले शहर आहे. 700 कोटी रुपयांचा टोल मी मुख्यमंत्री असताना घालवला. हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक निर्णय होता. कोल्हापूर शहराला वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.  कोल्हापूरमध्ये आता हळूहळू विकासाचा बदल पहायला मिळतोय.  वेगवेगळ्या क्षेत्रातील गुंतवणूक आता कोल्हापूरमध्ये यायला सुरुवात झाली आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रॅपीड फायर प्रश्नाला उत्तर देताना यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील मोठं विधान केलं आहे. मी जर राजकारणात नसतो तर चांगला वकील झालो असतो, एकनाथ शिंदे जर राजकारणात नसते तर ते चांगले सामाजिक संस्था किंवा युनियन लीडर झाले असते. अजित पवार जर राजकारणात नसते तर ते उत्तम शेतकरी झाले असते, किंवा पोलीस अधिकारी झाले असते कारण ते सर्वांना धाकात ठेवतात, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे  पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. शहरात कुठेही अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात विशेष पथक तयार करण्यात आले आहे.  यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दारू अड्ड्यांना माल पुरवणारे, वाहतूक करणारे आणि आर्थिक मदत करणाऱ्यांवरही पोलिसांचा फोकस असणार आहे.  पुण्यातील विविध भागांमध्ये पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली असून संशयित ठिकाणांची झडती घेतली जात आहे. अनेक अवैध अड्ड्यांची माहिती पोलिसांकडे जमा होत असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही अवैध दारू विक्रीची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...
धक्कादायक! तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...संभाजीनगरात हाय वोल्टेज ड्रामा!