AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा अन् शिंदे राजकारणात नसते तर काय बनले असते? मुख्यमंत्री फडणवीसांचं भन्नाट उत्तर

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.

अजितदादा अन् शिंदे राजकारणात नसते तर काय बनले असते? मुख्यमंत्री फडणवीसांचं भन्नाट उत्तर
देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 12, 2026 | 8:09 PM
Share

करवीर निवासिनी अंबाबाई आणि दख्खनच्या जोतिबाला नमन करतो, मी दोन वेळा नगरसेवक होतो, नागपूरचा महापौर देखील होतो. ज्याने पाप केलं तो नगरसेवक आणि महापाप केलं तो महापौर असतो. कारण शहरात कुठं काहीही झालं की पहिला नगरसेवक आणि नंतर महापौर यांना विचारलं जातं. जे सेवक म्हणून पाहिलं तर योग्य ठरतं, माझ्या शिवाय वार्डातून सुई देखील हलवता येणार नाही ही जी काही नगरसेवकांची मानसिकता असते ती  चुकीची आहे.  शहराचं नियोजन आधी फारसं होत नव्हतं, परंतु ग्रामीण भागातून नागरिक शहरात येत राहिले. संख्या वाढत राहिल्याने अव्यवस्था निर्माण झाली. सर्वात आधी मोदींनी शहराला निधी देण्यास सुरुवात केली, सर्व सुविधा शहरात असल्याने लोक शहरात येऊ लागले. मोदींनी शहरांसाठी अनेक योजना आणल्या असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  कोल्हापूर शहरात भेडसावणारे मुद्दे या पाच वर्षात आपण सोडवू शकतो. पर्यावरण, जल शुद्धीकरण आणि हवा प्रदूषण हे प्रश्न सोडवावे लागणार आहेत.  पूर्वीपासून हे सर्व क्षमता असलेले शहर आहे. 700 कोटी रुपयांचा टोल मी मुख्यमंत्री असताना घालवला. हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक निर्णय होता. कोल्हापूर शहराला वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.  कोल्हापूरमध्ये आता हळूहळू विकासाचा बदल पहायला मिळतोय.  वेगवेगळ्या क्षेत्रातील गुंतवणूक आता कोल्हापूरमध्ये यायला सुरुवात झाली आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रॅपीड फायर प्रश्नाला उत्तर देताना यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील मोठं विधान केलं आहे. मी जर राजकारणात नसतो तर चांगला वकील झालो असतो, एकनाथ शिंदे जर राजकारणात नसते तर ते चांगले सामाजिक संस्था किंवा युनियन लीडर झाले असते. अजित पवार जर राजकारणात नसते तर ते उत्तम शेतकरी झाले असते, किंवा पोलीस अधिकारी झाले असते कारण ते सर्वांना धाकात ठेवतात, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?