AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजी महाराज कोण होते? संभाजी ब्रिगेडचे मनोज आकरे म्हणतात, हे आम्ही सिद्ध करू

राज्यात हेतुपुरस्पर षडयंत्र रचण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते हे आम्ही सिद्ध करू, असंही मनोज आकरे म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराज कोण होते? संभाजी ब्रिगेडचे मनोज आकरे म्हणतात, हे आम्ही सिद्ध करू
मनोज आकरे
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 02, 2023 | 8:10 PM
Share

हिंगोली : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेपार्ह विधान केलं. त्यावर भाजप राज्यात आक्रमक झाली आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आकरे म्हणाले, भारतीय संस्कृतीचे संरक्षण म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडं बघतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. तो धार्मिक नव्हे तर स्वातंत्र्य लढा होता. सर्व जाती-जमातीचे लोक या स्वातंत्र्यलढ्यात एकत्र आले. त्यातून स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्याची निष्ठा ठेवून छत्रपती संभाजी महाराज यांनी लढाया केल्या. त्यामुळं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणणं काही वावगं नाही. स्वराज्यरक्षण हेचं छत्रपती संभाजी महाराज यांचं धर्मरक्षण होतं.

राज्यात महापुरुषांचा अपमान केला जात आहे. महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. कारण या महापुरुषांची देणं या महाराष्ट्राला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा अपमान वेळोवेळी केला जात आहे.

आता काही लोकं स्वराज्यरक्षण की, धर्मवीर या वादात समोर आलेत. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी होत होती. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची बदनामी केली जात होती. त्यावेळी या महाराष्ट्रात काय चाललं ते सुचलं नाही का, असा सवालही मनोज आकरे यांनी विचारला.

भाजप, आरएसएसची बांडगुळं जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील हे महापुरुषांची बदनामी करत होते तेव्हा कुठं होते, असा प्रश्नही त्यांनी विचारला. महाराष्ट्र यापुढं शांत बसणार नाही. राज्यात हेतुपुरस्पर षडयंत्र रचण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते हे आम्ही सिद्ध करू, असंही मनोज आकरे म्हणाले.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक