AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खाते वाटप का रखडलं? महायुतीत किती खात्यांबाबत वाद?; गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट काय?

मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे, मात्र अजूनही खातेवाटप होत नसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खाते वाटप का रखडलं? महायुतीत किती खात्यांबाबत वाद?; गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट काय?
| Updated on: Dec 20, 2024 | 8:25 PM
Share

राज्यात महायुतीचं सरकार आलं, त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर देखील अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. अखेर हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र त्यानंतर अजूनही मंत्र्यांना खात्याचं वाटप करण्यात आलेलं नाहीये. खाते वाटप रखडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, यावर आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील? 

खात मिळणार आहे, मात्र शपथ घेतल्यानंतर आता आपलं मंत्रिपदाचं काम सुरू झालं आहे. पुढील एक ते दोन दिवसांमध्ये खाते वाटप  जाहीर होईल. खाते वाटपला विलंब झालेला नाहीये, पण एक दोन खात्याबद्दल तिघांमध्ये वाद आहे. तिघे जण एकत्र बसतील आणि चर्चा करतील, त्यानंतर एक दोन दिवसांमध्ये खात्याचं वाटप होईल. कुठलही खातं मिळालं तर शेवटी खातं हे खात असतं. कॅबिनेट मंत्री होणं एवढं सोपं नाही, पाच वर्षांचा काळ काढल्यानंतर पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद भेटलं आहे. मला वाटतं दुसऱ्यांदा कबॅनेट मंत्रिपद भेटणं ही जळगाव जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे, असं यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, पालकमंत्री असो किंवा कोणतं खातं मी कुठल्याही गोष्टीसाठी डिमांड केलेली नाहीये, नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्या विश्वाला खरा उतरण्याचा मी प्रयत्न करेल. दरम्यान बीडमध्ये सरपंचाचं अपहरण करून हत्या करण्यात आली, हे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे, यावर देखील यावेळी गुलाबराव देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जी घटना घडली ती निश्चितपणे निषेधार्ह आहे. सभागृहामध्ये सुरेश धस यांनी यासंदर्भात निवृत्त न्यायाधीश किंवा सध्याचे न्यायाधीशांच्या मार्फत चौकशीच्या मागणी केली आहे. चौकशीत जे निष्पन्न होईल त्यात कोणालाही सोडला जाणार नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं.
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर.
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.