AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 हजार रुपयांसाठी महिलेचा मृतदेह 6 तास अडवून ठेवला,आंदोलनाचा इशारा देताच,काय घडले पाहा ?

नातेवाइकांकडून चाळीस हजार रुपयांची मागणी करीत एका महिलेचा मृतदेह तब्बल सहा तास अडवून ठेवल्याची घटना मलकापूर शहरात घडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत...

40 हजार रुपयांसाठी महिलेचा मृतदेह 6 तास अडवून ठेवला,आंदोलनाचा इशारा देताच,काय घडले पाहा ?
| Updated on: Apr 09, 2025 | 11:21 PM
Share

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अनामत रक्कम भरली नाही म्हणून उपचार बुलढाण्यातील मलकापुर शहरातील हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृतदेह चाळीस हजार रुपयांसाठी तब्बल सहा तास अडवून ठेवण्याची घटना घडली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया होऊन मृत्यू पावलेल्या एका महिला रुग्णांच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचा इशारा देताच अखेर या महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे या घरात पाय घसरून पडल्याने त्यांचा डावा हात आणि पाय फ्रॅक्चर होऊन त्या जखमी झाल्या होत्या. त्यांना मलकापूर येथील हकिमी मल्टी स्पेशालीस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ५ एप्रिल रोजी दाखल केले होते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून ७ एप्रिल रोजी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयात उपचार सुरू असतांना बुधवारी सकाळी ४ वाजताच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालय प्रशासनाने ४० हजार रुपये बिल बाकी असल्याचे सांगत त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला.

रुग्णालयाने आरोप फेटाळले !

वारंवार विनवणी करूनही मृतदेह ताब्यात देत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक यांनी या घटनेची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. याबाबत मात्र हॉस्पिटल प्रशासनाने या आरोपांचे खंडन केल आहे. या महिलेची अनेक कागदपत्रं जमा करणे बाकी होते आणि या महिलेचे राज्य शासनाकडून अप्रुव्हल घेणे बाकी असल्याने कागदी प्रक्रिया करण्यास वेळ लागला. त्यामुळे मृतदेह देण्यास विलंब झाल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे. मात्र, आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांकडे चाळीस हजार रुपये मागितलेले नाहीत असे रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी अनुप मालपाणी यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.