AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळीत 50 हजार हेक्टरवरचा गहू आडवाच ; शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज मातीत…

मागील अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याआधीच आता पुन्हा अवकाळी पावसाचे संकट ओढावल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.

अवकाळीत 50 हजार हेक्टरवरचा गहू आडवाच ; शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज मातीत...
शेती नुकसानीचा फोटो संग्रहित आहे.
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 08, 2023 | 3:38 PM
Share

यवतमाळ : काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने यवतमाळ जिल्ह्यात हजेरी लावलेली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याआधीच आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाल्याने यवतमाळमधील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मागील वेळी झालेल्या अवकाळी पावसात रब्बी हंगामावर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे आताही राहिलेल्या पिकावर अवकाळी पावसामुळे मोठे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांच मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे गहू आडवे झाले आहेत.

साधारण जिल्ह्यात 50 हजार हेक्टर नुकसानीच अंदाज वर्तविला जात आहे. खरीप हंगामा पासून रब्बी हंगामापर्यंत या गारपिटीने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडला नाही. या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, नेर, आर्णी या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

मागील अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याआधीच आता पुन्हा अवकाळी पावसाचे संकट ओढावल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने आता शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांवर ओढावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे आता तरी शासनाने पुन्हा एकदा पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल