AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई लोकल ऑगस्टमध्ये सुरु करण्याचा केंद्राचा विचार : पालकमंत्री अस्लम शेख

साधारण 400 पेक्षा जास्त लोकांना या गोष्टीचा उपयोग होईल, असेही अस्लम शेख (Aslam Shaikh on Mumbai Local Restart Again)  म्हणाले.

मुंबई लोकल ऑगस्टमध्ये सुरु करण्याचा केंद्राचा विचार : पालकमंत्री अस्लम शेख
| Updated on: Jul 14, 2020 | 4:50 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना अनलॉक आणि मिशन बिगीन अगेनची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार राज्यात काही शिथीलता देण्यात आली आहे. मुंबई लाईफलाईन मानली जाणारी लोकल येत्या ऑगस्टपासून सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. (Aslam Shaikh on Mumbai Local Restart Again)

“मुंबईतील लोकल व्यवस्था ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू करणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यानुसार केंद्र सरकार याबाबत विचार करेल. हा विषय राज्य सरकारच्या अंतर्गत नाही,” असे अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

“मुंबईतील डबेवाल्यांचे मुंबईकरांशी गेल्या अनेक वर्षापासून नातं जुळलेलं आहे. सध्याच्या संकटात या डबेवाल्यांना थोडीशी मदत व्हावी यासाठी किराणा सामान तसेच इतर काही महत्त्वाच्या सेवा-सुविधांचा आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. साधारण 400 पेक्षा जास्त लोकांना या गोष्टीचा उपयोग होईल,” असेही अस्लम शेख म्हणाले.

“जुलै महिना अखेरपर्यंत ताळेबंद चालू राहणार असल्याने बकरी ईद देखील याच कालावधीमध्ये आहे. गणपती सण असा थोडा कमी प्रमाणात साजरा केला जातो. तसेच स्वरूपाची भूमिका बकरी ईद बाबत देखील असावी. याबाबत राज्य सरकारबरोबर आज चर्चा केल्या जाणार असून मुख्यमंत्री याबाबत भूमिका स्पष्ट करतील, “असेही अस्लम शेख यांनी सांगितलं. (Aslam Shaikh on Mumbai Local Restart Again)

मुंबईची लाईफलाईन हळहळू पूर्वपदावर

‘लॉकडाऊन’मध्ये थांबलेली मुंबई अनलॉक करण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली आहे. सोमवारी 15 जूनपासून मुंबईची लोकल पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र यातून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत आहे. सर्वसामान्य प्रवाशांना यातून प्रवाशाची मुभा अद्याप देण्यात आलेली नाही.

सद्यस्थितीत मुंबईत 350 लोकल धावत आहेत. यात आवश्यक कर्मचारी, केंद्र, आयटी, जीएसटी, सीमाशुल्क, टपाल, राष्ट्रीयकृत बँका, एमबीपीटी, न्यायपालिका, संरक्षण आणि राजभवनाच्या कर्मचारी प्रवास करत आहेत.

संबंधित बातम्या : 

मुंबईतील कोरोना नियंत्रित, पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही : महापौर किशोरी पेडणेकर

Navi Mumbai Transfer | मिसाळ यांच्या बदलीची स्थगिती मागे, बांगर नवी मुंबई पालिका आयुक्त

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.