AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारने मागणी केल्यास तातडीने लोकल ट्रेन सुरु करु, रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण

राज्य सरकारने मागणी केल्यास तातडीने लोकल सेवा सुरु करु, असं मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Mumbai Local Train) .

राज्य सरकारने मागणी केल्यास तातडीने लोकल ट्रेन सुरु करु, रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण
| Updated on: Aug 27, 2020 | 10:06 PM
Share

मुंबई : लोकल ट्रेन लवकरच सुरु करण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत (Mumbai Local Train). त्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे. काही नियम आणि अटी ठेवून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करता येईल. मात्र, त्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Mumbai Local Train).

“लोकल सुरु करा, अशी प्रवाशांची मागणी आहे. लोकल वाहतूक सुरु करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. मात्र, राज्य सरकारने मागणी केल्यास लोकल त्वरित सुरु करु”, असं स्पष्टीकरण मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी दिलं आहे.

लोकलचा वापर सध्या केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी म्हणजेच पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचारी, पत्रकार अशा काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच करता येत आहे. सर्वसामान्य प्रवाशांनी अद्याप लोकलने प्रवास करता येत नाही. लॉकडाऊननंतर 15 जून रोजी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन सुरु झाल्या होत्या.

लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन मानली जाते. मात्र, कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल बंद आहेत. लॉकडाऊन घोषित केल्यानंतर तीन महिन्यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना अजूनही लोकलचा प्रवास करता येत नाही. त्यामुळे लोकल सुरु करा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा : ‘मोदी सरकारच्या आडमुठेपणाला विरोध’, काँग्रेसची जेईई-नीट परीक्षेविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.