AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंध्र प्रदेशातील फार्मा युनिटला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी

हैदराबाद : आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) गुरुवारी मध्यरात्री एका फार्मासिटिकल युनिटला भीषण आग (fire broke) आलगल्याची घटना समोर येत आहे. या भीषण दुर्घटनेत काम करत असताना 6 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर ही भीषण दुर्घटना गॅस गळतीमुळे झाल्याचे सांगितले जात आहे. तर गॅस गळतीमुळे अणुभट्टीचा स्फोट झाल्याने […]

आंध्र प्रदेशातील फार्मा युनिटला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी
आंध्र प्रदेशात पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील एका फार्मासिटिकल कंपनीला आग Image Credit source: TV9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Apr 14, 2022 | 10:59 AM
Share

हैदराबाद : आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) गुरुवारी मध्यरात्री एका फार्मासिटिकल युनिटला भीषण आग (fire broke) आलगल्याची घटना समोर येत आहे. या भीषण दुर्घटनेत काम करत असताना 6 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर ही भीषण दुर्घटना गॅस गळतीमुळे झाल्याचे सांगितले जात आहे. तर गॅस गळतीमुळे अणुभट्टीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा संशय आहे. ही घटना पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथे घडली. आग लागली तेव्हा फार्मासिटिकल युनिट 4 मध्ये 18 कामगार काम करत होते. लागलेली आग दोन तासांच्या प्रयत्नानंतरआटोक्यात आणण्यात आली. मृत्युमुखी पडलेल्या सहापैकी 4 जण हे बिहारमधील स्थलांतरित कामगार होते. आतापर्यंत 2 मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उदुरुपती कृष्णय्या, बी किरण कुमार, कारू रवी दास, मनोज कुमार, सुवास रवी दास आणि हबदास रवी दास अशी मृतांची नावे आहेत. यानंतर याप्रकरणी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Chief Minister Jagan Mohan Reddy) यांनी दिले आहेत.

6 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशात पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील एका फार्मासिटिकल कंपनीला आग लागली. ही आग गुरुवारी मध्यरात्री कंपनीच्या युनिट 4 मध्ये लागली. जेव्हा तेथे 18 कामगार काम करत होते. या भीषण दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. यानंतर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी 5 लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 2 लाख रूपये ही मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी जखमींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सखोल चौकशीचे आदेश

आंध्र प्रदेशात पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील एका फार्मासिटिकल कंपनीला लागलेल्या आगीचे कारण हे नेमके कळालेले नाही. मात्र ही आग गॅस गळतीमुळे अणुभट्टीचा स्फोट झाल्याने लागल्याचा संशय आहे. तर या भीषण दुर्घटनेत काम करत असताना 6 जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. ही घटना गंभीर असल्याने मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी चौकशी केली जाईल असे म्हटले आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली