AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंध्र प्रदेशातील फार्मा युनिटला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी

हैदराबाद : आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) गुरुवारी मध्यरात्री एका फार्मासिटिकल युनिटला भीषण आग (fire broke) आलगल्याची घटना समोर येत आहे. या भीषण दुर्घटनेत काम करत असताना 6 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर ही भीषण दुर्घटना गॅस गळतीमुळे झाल्याचे सांगितले जात आहे. तर गॅस गळतीमुळे अणुभट्टीचा स्फोट झाल्याने […]

आंध्र प्रदेशातील फार्मा युनिटला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी
आंध्र प्रदेशात पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील एका फार्मासिटिकल कंपनीला आग Image Credit source: TV9
| Updated on: Apr 14, 2022 | 10:59 AM
Share

हैदराबाद : आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) गुरुवारी मध्यरात्री एका फार्मासिटिकल युनिटला भीषण आग (fire broke) आलगल्याची घटना समोर येत आहे. या भीषण दुर्घटनेत काम करत असताना 6 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर ही भीषण दुर्घटना गॅस गळतीमुळे झाल्याचे सांगितले जात आहे. तर गॅस गळतीमुळे अणुभट्टीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा संशय आहे. ही घटना पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथे घडली. आग लागली तेव्हा फार्मासिटिकल युनिट 4 मध्ये 18 कामगार काम करत होते. लागलेली आग दोन तासांच्या प्रयत्नानंतरआटोक्यात आणण्यात आली. मृत्युमुखी पडलेल्या सहापैकी 4 जण हे बिहारमधील स्थलांतरित कामगार होते. आतापर्यंत 2 मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उदुरुपती कृष्णय्या, बी किरण कुमार, कारू रवी दास, मनोज कुमार, सुवास रवी दास आणि हबदास रवी दास अशी मृतांची नावे आहेत. यानंतर याप्रकरणी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Chief Minister Jagan Mohan Reddy) यांनी दिले आहेत.

6 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशात पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील एका फार्मासिटिकल कंपनीला आग लागली. ही आग गुरुवारी मध्यरात्री कंपनीच्या युनिट 4 मध्ये लागली. जेव्हा तेथे 18 कामगार काम करत होते. या भीषण दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. यानंतर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी 5 लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 2 लाख रूपये ही मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी जखमींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सखोल चौकशीचे आदेश

आंध्र प्रदेशात पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील एका फार्मासिटिकल कंपनीला लागलेल्या आगीचे कारण हे नेमके कळालेले नाही. मात्र ही आग गॅस गळतीमुळे अणुभट्टीचा स्फोट झाल्याने लागल्याचा संशय आहे. तर या भीषण दुर्घटनेत काम करत असताना 6 जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. ही घटना गंभीर असल्याने मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी चौकशी केली जाईल असे म्हटले आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.