AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दर आठवड्याला ८० हजार लोक एलपीजी ते पीएनजीमध्ये कन्व्हर्ट, तीन महिन्यांचा तो नियम काय ?

पेट्रोलियम मंत्रालयाच्या मते पाच आठवड्यात चार लाखांहून अधिक एलपीजी कनेक्शनचे पीएनजीत रुपांतर झाले आहे.या काळात ४.४१ लाख नवीन ग्राहक जोडले गेले आहे. सरकारने एलपीजीचा आणि क्रुड ऑईलचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे.पीएनजीचा वापर वाढण्यासाठी सरकारने नवे धोरण आणले आहे.

दर आठवड्याला ८० हजार लोक एलपीजी ते पीएनजीमध्ये कन्व्हर्ट, तीन महिन्यांचा तो नियम काय ?
LPG TO PNG Converted
| Updated on: Apr 10, 2026 | 9:38 PM
Share

पश्चिम आशियातील तणावादरम्यान सरकारच्या वतीने दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने शुक्रवारी माहिती दिली आहे की गेल्या पाच आठवड्यात ४ लाखाहून जास्त एलपीजी कनेक्शनना पीएनजीमध्ये बदलले आहे. यासोबत दर दिवसी सुमारे १ लाख ५ किलोवाले सिलिंडर देखील दिले जात आहेत. या शिवाय याच काळात ४ लाख ४१ हजार नवीन ग्राहकांनी पीएनजीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे.

एलपीजी पुरवठ्यावर सरकारला विश्वास

पेट्रोलियम मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी सचिव सुजाता शर्मा यांनी एका इंटर-मिनिस्टेरियल प्रेस ब्रीफिंग मध्ये सांगितले की घरगुती एलपीजी पुरवठा सामान्य झाला आहे आणि डिस्ट्रीब्युटर्सजवळ पर्याप्त स्टॉक उपलब्ध आहे. त्यांनी हे देखील सांगितले की देशात एलपीजीचे उत्पादन वाढवण्यात आले आहे.

सरकारने हे देखील स्पष्ट केले की देशात क्रुड ऑईलचा पुरेसा साठा आहे. आणि कोणत्याही प्रकारची तात्काळ टंचाईची स्थिती नाही.यामुळे ऊर्जा सुरक्षेसंदर्भात चिंता कमी झालेली आहे.

पश्चिम देशातील संकटानंतर पीएनजीवर जोर देणार

मार्चमध्ये पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठा प्रभावित झाल्याने एलपीजी सिलिंडरची टंचाई पाहायला मिळत आहे. यानंतर सरकारने घरगुती आणि कमर्शियल युजर्सना पीएनजीकडे वळवण्यास जोर लावला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या भागात पाईपलाईनचे नेटवर्क उपलब्ध आहे, तेथे पीएनजी कनेक्शन घेणे अनिवार्य असणार आहे. जर कोणत्याही ग्राहकांनी तीन महिन्याच्या आत पीएनजी कनेक्शन घेतले नाही तर त्याचा एलपीजी पुरवठा बंद केला जाईल. मात्र, जेथे तांत्रिक कारणाने पाईपलाईन देणे शक्य नाही, तेथे एनओसीच्या आधारावर एलपीजी पुरवठा सुरु राहू शकतो.

एलपीजी सोडण्यासाठी पोर्टल जारी

सरकारने एक पोर्टल सुरु केले आहे. जेथे पीएनजी घेणारे ग्राहक एलपीजी सोडण्याची इच्छा जाहीर करु शकतात. यानंतर गॅस एजन्सी घरातून सिलिंडर परत घेणार आणि सिक्युरिटी डिपॉझिट रिफंड करेन. २४ मार्च रोजी जारी केलेल्या नव्या ऑर्डर अंतर्गत पाईपलाईनचा वेगाने विस्तार करणे, मंजूरीची प्रक्रिया सोपी करणे आणि एलपीजी वरुन पीएनजीमध्ये बदल करण्यास प्रोत्साहन देण्याचे लक्ष्य राखण्यात आले आहे.

इंडस्ट्रीला कमी, घरांना जास्त गॅस

केंद्र सरकारने घरगुती उपयोग आणि ट्रान्सपोर्ट सेक्टरसाठी गॅस पुरवण्यास प्राथमिकता दिली आहे. पीएनजी आणि सीएनजी सेगमेंटला संपूर्ण पुरवठा केला जात आहे.तर इंडस्ट्रीला सरासरी ८० टक्के गॅस दिला जात आहे. पुरवठा सुरळीत राखण्यासाठी अतिरिक्त एलएनजी कार्गो देखील मागवण्यात आले आहेत.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....