AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके भडकले, थेट म्हटले, अजिबात बांगलादेश आणि नेपाळच्या..

अभिजीत दिपके यांचे आंदोलन फक्त देशापुरतेच मर्यादित राहिले नाही तर त्यांच्या पार्टीची आणि आंदोलनाची जगभरात चर्चा होती. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. आता अभिजीत दिपके यांनी नुकताच मोठे विधान केले.

अभिजीत दिपके भडकले, थेट म्हटले, अजिबात बांगलादेश आणि नेपाळच्या..
Abhijeet Dipke
| Updated on: Aug 04, 2026 | 12:30 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीला अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख मिळाली. अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले आणि मोठे आंदोलन उभे केले. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले. पण दुसऱ्या प्रयत्नात त्यांचे आंदोलन देशभरात पोहोचले. जेनझी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची संख्या वाढली. शेवटी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या दोन मागण्या मान्य केल्या आणि आंदोलन थांबले. अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले. कॉकरोच जनता पार्टी तूफान चर्चेत आली. अभिजीत दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंकेत जे घडले तेच भारतात घडवण्याचा डाव होता, असे सांगितले जातंय. त्यावर आता अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली.

अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बांगलादेश आणि नेपाळला बघण्याची अजिबात गरज नाही. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना अभिजीत दिपके यांनी बांगलादेशी लेखिका तसलीमा नसरीन यांनी केलेला आरोप खोटा आहे. अभिजीत दिपके याने म्हटले की, बांग्लादेश आणि नेपाळचे नाव घेत आमच्या आंदोलनाला बदनाम केले जातंय.

आम्ही त्यांच्यापेक्षा खूप जास्त वेगळे आहोत. आम्ही दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान संविधानाचे पालन केले. शांततापूर्ण आमचे आंदोलन होते. मुळात म्हणजे बांगलादेश किंवा नेपाळकडे बघण्याची आम्हाला अजिबात गरज नाही. आमच्याकडे महात्मा गांधी यांचे विचार आहेत. भारतातील विद्यार्थी आक्रमक नव्हते. संयमाने दिल्लीतील आंदोलन सुरू होते.

पुढे अभिजीत दिपके याने म्हटले की,बांगलादेश आणि नेपाळमध्ये झालेल्या आंदोलनाची आठवण त्यांना कदाचित पोलिसांकडून करण्यात आलेल्या वर्तनामुळे झाली असेल. हात पाय तुटले पण त्यांनी शेवटपर्यंत आपल्या संयम सोडला नाही. आम्ही शांतपणे जंतर मंतवर आंदोलन केले. त्यामुळे मुळातच आमच्या आंदोलनाची तुलना नेपाळ आणि बांगलादेशच्या आंदोलनाशी करणे चुकीचे आहे. अभिजीत दिपके यांनी भाजपावर काही आरोप केले. विद्यार्थ्यांचा छळ जंतर मंतरवर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी