AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाच्यावर हल्ला होताच ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या ‘शासक बनले मारेकरी…’

बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या भाच्यावर हल्ला करण्यात आला आहे. सोनारपूर येथे एका कार्यकर्त्याच्या घरी जात असताना हा हल्ला झाला आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पोस्ट लिहित भाजपवर टीका केली आहे.

मोठी बातमी! भाच्यावर हल्ला होताच ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या 'शासक बनले मारेकरी...'
Abhishek Banerjee mamataImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 31, 2026 | 7:53 AM
Share

तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालाल आहे. पक्षाच्या एका हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या घरी जात असताना अभिषेक बॅनर्जी यांना विरोधाचा सामना करावा लागला. भर रस्त्यात त्यांचे कपडे फाडले, त्यांच्या अंगावर अंडी फेकत हल्ला झाल्याचाही आरोप आहे. या हल्लाचा बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी यांनी तीव्र निषेध केला आहे.

सोनारपूर येथील या घटनेवर ममता बॅनर्जी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ‘X’ हँडलवर लिहिताना त्या म्हणाल्या की सत्तेत बसलेले लोकच आता मारेकरी बनले आहेत. भाजपला याची लाज वाटायला हवी. दुसरीकडे, राष्ट्रीय पातळीवरील विरोधी गट ‘इंडिया’ आघाडीच्या मित्रपक्षांनीही या संपूर्ण घटनाक्रमावर आवाज उठवला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या ‘X’ हँडलवरून भाजपचा तीव्र निषेध केला.

भाजपने टीएमसीचे आरोप फेटाळले

मात्र, या घटनेवर भाजपचे म्हणणे आहे की सोनारपूरच्या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य म्हणाले की, या घटनेत भाजपचा कोणताही सहभाग नाही. गेल्या पाच वर्षांत दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात तृणमूलने ज्या प्रकारचे अत्याचार केले आहेत, ते पाहता जर भाजपने ठरवले असते तर तृणमूलचे नेते आज घराबाहेर पाऊलही टाकू शकले नसते. भाजपने जो संयम बाळगला आहे, त्याचाच हा परिणाम आहे की तृणमूलचे नेते आज अशा प्रकारे फिरू शकत आहेत.

टीएमसीकडून हल्ल्याचा निषेध

तृणमूल काँग्रेसने सोशल मीडियावर निवेदन जारी करत अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. त्यांच्या ‘X’ वरील पोस्टमध्ये लिहिले होते की, एका क्रूर हल्ल्याचा सामना केल्यानंतरही अभिषेक बॅनर्जी यांनी संजू कर्मकार यांच्या शोककुल कुटुंबाची साथ सोडली नाही. आमच्या अखिल भारतीय सरचिटणीसांनी भाजप पुरस्कृत गुंडांसमोर गुडघे टेकले नाहीत. त्याऐवजी ते भाजप समर्थित या गुंडांचे शिकार झालेल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सहानुभूतीचे राजकारण आणि द्वेषाचे राजकारण यातील हाच मूलभूत फरक आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना उद्देशून या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, आजच्या घटनेने पुन्हा एकदा तुमच्या राजकारणाचा खरा चेहरा उघड केला आहे. तुमचे राजकारण धमकावणे, हिंसाचार आणि सुडाच्या भावनेवर आधारित आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपला धरले जबाबदार

या घटनेनंतर अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केला की हा हल्ला भाजप समर्थित गुंडांनीच घडवून आणला आहे. ते म्हणाले की, आपण पक्षाचे कार्यकर्ते संजू कर्मकार यांना भेटायला गेलो होतो, जे कथितरित्या निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे बळी ठरले होते. त्यांनी असा दावाही केला की हल्ल्याच्या वेळी तिथे पोलीस उपस्थित नव्हते. टीएमसी खासदाराने म्हटले आहे की, ते या प्रकरणाबाबत कलकत्ता उच्च न्यायालयात दाद मागतील आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल आर.एन. रवी यांनाही या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती देतील.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक