AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena: खरी शिवसेना कुणाची? शिंदे गटाच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा

आम्ही खरी शिवसेना आहोत असा यु्क्तीवाद कौल यांनी केला आहे. शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा आहे असेही कौल म्हणाले.

Shivsena: खरी शिवसेना कुणाची? शिंदे गटाच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा
| Updated on: Sep 27, 2022 | 4:19 PM
Share

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. खरी शिवसेना कुणाची? यावरुन संघर्ष चांगलाच पेटला आहे. दोन्ही गट शिवसेनेवर आपला दावा करत आहेत. अशातच एकनाथ शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सुप्रीम कोर्टात मोठा दावा केला आहे.

आम्ही खरी शिवसेना आहोत असा यु्क्तीवाद कौल यांनी केला आहे. शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा आहे असेही कौल म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या संदर्भातचं अंतरीम याचिका आम्ही दाखल केली होती. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. शिवसेना कोणाची हे फक्त निवडणूक आयोगच ठरवू शकते.

विधिमंडळात जरी अपात्र झाले असले तरी पक्षाचं सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. आम्ही ठरवू की ओरीजनल पक्ष कोणता आहे.

अध्यक्षांचे अधिकार यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. ओरीजनल पक्ष कोणता हे निवडणूक आयोगचं ठरवणार असं निवडणुक आयोगाचे वकिल दातार यांनी केला आहे.

शिवसेनेसह बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. एकनाथ शिंदेच्या( Shiv Sena) बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना कुणाची? असा वाद निर्माण झाला. उद्धव ठाकरे आणि शिंदे गाटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवसेनेवर दावा करतानाच निवडणुकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळावण्याचाही शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.