AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Floods : नेपाळनंतर आता भारतात महापुराचं संकट, गावांना पाण्याचा वेढा; घरांमध्ये पाणी शिरलं, रेस्क्यू ऑपरेशनला सुुरुवात

नेपाळमध्ये महापुरामुळे हाहाकार उडालेला असतानाच आता उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये मोठं संकट आलं आहे. मंदाकिनी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Nepal Floods : नेपाळनंतर आता भारतात महापुराचं संकट, गावांना पाण्याचा वेढा; घरांमध्ये पाणी शिरलं, रेस्क्यू ऑपरेशनला सुुरुवात
Mandakini RiverImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 5:50 PM
Share

नेपाळमध्ये महापुरामुळे हाहाकार उडालेला असतानाच आता उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये मोठं संकट आलं आहे. मंदाकिनी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नेपाळच्या मार्गाने उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये आलेलं पाणी नदी काठच्या लोकांच्या घरात शिरलं आहे. रस्ते देखील बंद झाले आहेत. रस्त्यावरून पाणी वाहत आहे. नदीच्या काठी असलेले आश्रम, मंदिर, मठ, रामघाट आणि दुकानं तसेच हॉटेल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे लोकांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे.

या घटनेबाबत माहिती देताना स्थानिक ज्येष्ठ नागरिक राम सलोने यांनी सांगितलं की गेल्या 90 वर्षांमध्ये आम्ही कधीही मंदाकिनी नदीला एवढा मोठा महापूर पाहिला नव्हता. मंदाकिनी नदीला आलेल्या पुरामुळे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील जो भाग या नदीच्या काठावर आहे, त्याला प्रचंड फटका बसला आहे. लोकांच्या घरात पाणी घुसलं आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे नागरिकांचा मोठा गोंधळ उडाला आहे. पाण्यापासून बचाव करण्यासाठी लोकांनी आपल्या घराच्या छतावर आश्रय घेतला आहे. नदी काठच्या गावांना पाण्याचा वेढा पडला असून, चारही बाजूने पाणीच पाणी दिसून येत आहे. दरम्यान आता या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. मंदाकिनी नदीच्या पाणीपातळीत एवढी प्रचंड वाढ झाली आहे की, रामघाट येथील मोठा पूल देखील पाण्याखाली गेला आहे. नदीच्या काठी असलेले अनेक धार्मिक स्थळं देखील पाण्याखाली गेले आहेत. यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे.

जानकीकुंड, पंजाबी भगवान आश्रम, आरोग्यधाम, सद्गुरू सेवा संघ, आश्रम, जगद्गुरू रामभद्राचार्य आश्रम या प्रमुख आश्रमासह या परिसरात असलेल्या शेकडो आश्रमांमध्ये पाणी शिरलं आहे. परिस्थिती चिंताजनक बनली आहे. लोकं घरात अडकून पडले आहेत. दरम्यान आता स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून, या पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे. परिस्थिती चितांजनक बनली आहे, पुराचा मोठा फटका बसला आहे.

Follow Us
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितला मोठा प्लॅन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, फडणवीसांनी केलं स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्वागत
शरद पवारांच्या पार्टीकडून 10 प्रवक्त्यांची घोषणा, कोणाला मिळाली संधी?
शरद पवारांच्या पार्टीकडून 10 प्रवक्त्यांची घोषणा, यादी आली समोर; कोणाला संधी मिळाली?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; काय म्हणाले?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; नेमकं काय म्हणाले?
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी