AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगामनंतर सर्व जगाने दहशतवादाचा निषेध नोंदवला, पण पाकिस्तानचा नाही, का?; राहुल गांधी यांचा संतप्त सवाल

काँग्रेस नेते राहुल गांधी ऑपरेशन सिंदूर प्रकरणातील संसदेत सुरु असलेल्या चर्चेत सहभागी होत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या सैन्यांना जादा अधिकार देण्यात आले नव्हते असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

पहलगामनंतर सर्व जगाने दहशतवादाचा निषेध नोंदवला, पण पाकिस्तानचा नाही, का?; राहुल गांधी यांचा संतप्त सवाल
rahul gandhi news
| Updated on: Jul 29, 2025 | 7:55 PM
Share

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवर संसदेत सुरु असलेल्या चर्चेप्रसंगी बोलताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर प्रसंगी भारतीय सैन्याचे हात बांधलेले होते. त्यांना पाकिस्तानच्या सैन्य तळ आणि एअर डिफेन्सवर हल्ला करण्याची परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे आपल्या सैन्याला अधिकार दिले नसल्याने नुकसान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. साऱ्या जगाने पहलगामनंतर दहशतवादाचा निषेध नोंदवला परंतू पाकिस्तानचा एकाही देशाने निषेध नोंदवला नाही असाही सवाल राहुल गांधी यांनी यावेळी केला.

संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. या चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी यांनी सरकारवर तिखट भाषेत हल्ला केला. राहुल गांधी यावेळी म्हणाले की आपले परराष्ट्रमंत्री म्हणाले, की सर्व देशाने टेररिझमचा निषेध नोंदवला.हे शंभर टक्के बरोबर आहे. परंतू आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे सांगितले नाही की पहलगाम नंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध नोंदवलेला नाही. फक्त दहशतवाद्याचा निषेध नोंदवाला. याचा अर्थ जग पाकिस्तानच्या बाजूने आहे.

ते ट्रम्पसोबत जेवत आहेत

पहलगाम नंतर अमेरिकेने पाकिस्तानचे जनरल मुनीर यांचे स्वागत केले.ज्यांनी पहलगामचा कट रचला त्यांना पायघड्या घातल्या जात आहेत. पहलगामच्या मागे जनरल मुनीर आहे. पण ते ट्रम्पसोबत जेवत आहेत. ट्रम्प सर्व प्रोटोकॉल तोडून मुनीरचं स्वागत करतात.आपले पंतप्रधान त्यांचा निषेधही नोंदवत नाही असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. दहशतवाद्यांचा हल्ला झाला तर आम्ही युद्ध करू असं तुम्ही सांगितलं आहे. परंतू  तुम्ही दहशतवाद्यांना युद्धासाठीची खुली छूटच दिली. हे काय चाललंय. उद्या दहशतवाद्यांनी हल्ला केला तर तुम्ही काय करणार आहात? हे सरकार काय करत आहे असाही सवाल राहुल गांधी यांनी केला.

Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच