AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punjab | अडकले मोदी, आठवले गांधी! नेमका काय आहे हा प्रकार जो पुन्हा पुन्हा ट्रेन्ड होतोय?

मोदी विरुद्ध गांधी, अशी लढाई याआधीही सोशल मीडियामध्ये अनेकदा पाहायला मिळालेली आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत याच सगळ्याबाबत वेगळं ट्वीट समोर आलं आहे.

Punjab | अडकले मोदी, आठवले गांधी! नेमका काय आहे हा प्रकार जो पुन्हा पुन्हा ट्रेन्ड होतोय?
मोदींचा ताफा रोखण्याचा शेतकऱ्यांनी अजिबात प्रयत्न केलेला नाही
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jan 05, 2022 | 6:40 PM
Share

सोशल मीडियात (Social Media) मोदी सर्वात जास्त चर्चिले जातात, यात शंका घेण्याचं काहीच कारण नाही. व्हॉट्सअप (WhatsApp), फेसबुकवर (Facebook) मोदींवरचे मेसेज, त्याचे ट्वीट (Tweet), फेसबुकवरच्या पोस्ट (Post) असं सगळं सातत्यानं चर्चेत. अशातच आता मोदी (Narendra Modi) पंजाबातल्या (Punjab) एका फ्लायओव्हरवर 15 ते 20 मिनिटं अडकल्याच्या बातमीनं पुन्हा एक मोदी सगळ्या सोशल मीडियात ट्रेन्ड झाले नसते, तरच नवल. अनेकांनी या घटनेवर वेगवेगळे हॅशटॅग वापरत पोस्ट केल्या आहेत. मात्र या सगळ्या गेल्या काही काळापासून सुरु झालेला एक ट्रेन्ड मोदी विरुद्ध गांधी असा सुरु झाला तो, तो यावेळी बघायला मिळालेलाय.

मोदी पंजाबमध्ये अडकले. पण तरिही लोकांना राजीव गांधी का आठवलेत, असाही एक प्रश्न उपस्थित होतोय. नेमकं यामागचं कारण आहे तरी काय?, हे देखील समजून घ्यायला हवं.

काय झालंय गांधी आठवायला?

त्याचं झालं असं, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत पंजाबमध्ये मोठी चूक झाली. एका फ्लायओव्हरवर मोदींचा ताफा अडकून पडला होती. पंधरा ते वीस मिनिटं मोदींचा ताफा अडकून पडल्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली. पंजाबमधील आंदोलकांनी हा ताफा अडकवल्याचं बोललं जातंय. दरम्यान, याबाबत आता केंद्रीय गृहमंत्रालयानं पंजाब सरकारकडे स्पष्टीकरणही मागितलं.

राजकारण या गोष्टीवरुन सुरु झालं नसतं, तरच नवल! भाजपनं पंजाब काँग्रेसला या घटनेवरुन तीव्र शब्दांत सुनावलंय. महाराष्ट्रातले भाजपचे नेतेही या घटनेची टीका करत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेवर ट्वीट करत निषेध नोंदवलाय. पण एकानं या घटनेच्या निमित्तानं थेट गांधी परिवाराची आठवण काढली आहे.

मोदी विरुद्ध गांधी, अशी लढाई याआधीही सोशल मीडियामध्ये अनेकदा पाहायला मिळालेली आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत याच सगळ्याबाबत वेगळं ट्वीट समोर आलं आहे.

प्रत्युश कुमार श्रीवास्तव यांनी हे ट्वीट केलं आहे. प्रत्युश यांनी केलेल्या दाव्यानुसरा 1987 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर हल्ला झाला होता. एका बंदुकीनं हा हल्ला करण्यात आला होता, असंही ते म्हणालेत. तर दुसरीकडे तामिळनाडूत 1991 साली त्यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, आता पंजाबमध्ये झालेला हा प्रकार हा देखील त्याचप्रकारचा असल्याचं त्यांनी म्हटलंय. याप्रकरणी वेळीच कठोर कारवाई केली पाहिजे. असं प्रत्युश यांचं म्हणणंय. पाच वाजून तेरा मिनिटांनी त्यांनी हे ट्वीट केलंय. या ट्वीटसोबत त्यांनी राजीव गांधीचा एक फोटोही शेअर केला आहे.

राजकारण जोरात!

दरम्यान, महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील भाजपच्या नेते आणि मंत्र्यांनी पंजाबमध्ये जे झालं, त्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. वाचा कोणत्या राजकीय नेत्यांनी काय म्हटलंय?

नितीन गडकरी यांचं ट्वीट –

रावसाहेब दानवेंचं ट्वीट – 

जेपी नड्डा यांचं ट्वीट –

इतर बातम्या –

PM MODI PUNJAB | समजून घ्या, नेमकं मोदींसोबत पंजाबमध्ये काय झालं? सुरक्षेतली चूक की आणखी काही?

Sanjay Raut: अब्दुल सत्तारांची हळद अजून उतरायची आहे, त्यांना बोलायचं ते बोलू द्या, संजय राऊतांचा टोला

VIDEO: दोन-चार पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही, राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली