AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asaduddin Owaisi : ‘काश्मीर आमच अभिन्न अंग आहे, तर मग…’, असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा पाठित सुरा खुपसण्यावर उतरलेत, असा आरोप ओवैसी यांनी केला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी विधेयकाच समर्थन करुन आपल्या मुलाचं राजकीय भविष्य पणाला लावल्याची टीका ओवैसीनी केली.

Asaduddin Owaisi : 'काश्मीर आमच अभिन्न अंग आहे, तर मग...', असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?
asaduddin owaisi
| Updated on: Apr 28, 2025 | 11:50 AM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला अणवस्त्रांवरुन सुनावलं आहे. “पाकिस्तान नेहमी, ते अणवस्त्र संपन्न देश असल्याचे सांगतो. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जर ते कुठल्या देशात जाऊन निरपराधांना मारणार असतील, तर कुठलाही देश गप्प बसणार नाही” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. “अशा प्रकारे तुम्ही भारताच्या भूमीवर येऊन हल्ला करता. धर्म विचारुन गोळ्या चालवल्या. तुम्ही कुठल्या दिवसाबद्दल बोलत आहात? तुम्ही तर ISIS सारखं काम केलं आहे” असं त्यांनी पाकिस्तानला सुनावलं. “मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की, काश्मीर आमच अभिन्न अंग आहे, तर तिथले काश्मिरी सुद्धा आमचं अभिन्न अंग आहेत. आपण काश्मिरींवर संशय घेऊ शकत नाही” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन पाकिस्तानवर निशाणा साधताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “वेळेच्या हिशोबाने पाकिस्तान भारतापेक्षा अर्धातास मागे आहे. पण तसं पहायला गेलं तर पाकिस्तान भारतापेक्षा 50 वर्षांनी मागे आहे”

पाकिस्तानी नेत्यांच्या धमकीची खिल्ली उडवली

वक्फ संशोधन विधेयकाला विरोध करण्यासाठी रविवारी असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्रात एका सार्वजनिक बैठकीला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला. हैदराबादचे खासदार असणारे ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या धमकीची खिल्ली उडवली. ‘तुमच्या देशाच बजेट, आमच्या देशाच्या सैन्य बजेटच्या आसपासही नाही’ असं ओवैसी म्हणाले.

‘बत्ती गुल’ कार्यक्रमात सहभागी व्हा

पाकिस्तानला आर्थिक दृष्टया कमजोर करण्यासाठी पंतप्रधानांनी पावलं उचलावीत अशी मागणी ओवैसी यांनी केली. वक्फ सुधारणा विधेयकावर ओवैसीनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून (एआयएमपीएलबी) आयोजित होणाऱ्या विरोध कार्यक्रमात सहभागी होण्याच आवाहन केलं. त्यांनी 30 एप्रिलला लाइट बंद करुन ‘बत्ती गुल’ कार्यक्रमात सहभागी होण्याच आवाहन केलं.

अजित पवारांवर साधला निशाणा

वक्फ संशोधन विधेयकाच समर्थन केल्याबद्दल ओवैसीनी अजित पवार, नितीश कुमार, जयंत चौधरी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर निशाणा साधला. मुस्लिम आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेचे लोक त्यांना माफ करणार नाहीत, असं ते म्हणाले.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.