AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asaduddin Owaisi : ‘काश्मीर आमच अभिन्न अंग आहे, तर मग…’, असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा पाठित सुरा खुपसण्यावर उतरलेत, असा आरोप ओवैसी यांनी केला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी विधेयकाच समर्थन करुन आपल्या मुलाचं राजकीय भविष्य पणाला लावल्याची टीका ओवैसीनी केली.

Asaduddin Owaisi : 'काश्मीर आमच अभिन्न अंग आहे, तर मग...', असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?
asaduddin owaisi
| Updated on: Apr 28, 2025 | 11:50 AM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला अणवस्त्रांवरुन सुनावलं आहे. “पाकिस्तान नेहमी, ते अणवस्त्र संपन्न देश असल्याचे सांगतो. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जर ते कुठल्या देशात जाऊन निरपराधांना मारणार असतील, तर कुठलाही देश गप्प बसणार नाही” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. “अशा प्रकारे तुम्ही भारताच्या भूमीवर येऊन हल्ला करता. धर्म विचारुन गोळ्या चालवल्या. तुम्ही कुठल्या दिवसाबद्दल बोलत आहात? तुम्ही तर ISIS सारखं काम केलं आहे” असं त्यांनी पाकिस्तानला सुनावलं. “मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की, काश्मीर आमच अभिन्न अंग आहे, तर तिथले काश्मिरी सुद्धा आमचं अभिन्न अंग आहेत. आपण काश्मिरींवर संशय घेऊ शकत नाही” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन पाकिस्तानवर निशाणा साधताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “वेळेच्या हिशोबाने पाकिस्तान भारतापेक्षा अर्धातास मागे आहे. पण तसं पहायला गेलं तर पाकिस्तान भारतापेक्षा 50 वर्षांनी मागे आहे”

पाकिस्तानी नेत्यांच्या धमकीची खिल्ली उडवली

वक्फ संशोधन विधेयकाला विरोध करण्यासाठी रविवारी असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्रात एका सार्वजनिक बैठकीला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला. हैदराबादचे खासदार असणारे ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या धमकीची खिल्ली उडवली. ‘तुमच्या देशाच बजेट, आमच्या देशाच्या सैन्य बजेटच्या आसपासही नाही’ असं ओवैसी म्हणाले.

‘बत्ती गुल’ कार्यक्रमात सहभागी व्हा

पाकिस्तानला आर्थिक दृष्टया कमजोर करण्यासाठी पंतप्रधानांनी पावलं उचलावीत अशी मागणी ओवैसी यांनी केली. वक्फ सुधारणा विधेयकावर ओवैसीनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून (एआयएमपीएलबी) आयोजित होणाऱ्या विरोध कार्यक्रमात सहभागी होण्याच आवाहन केलं. त्यांनी 30 एप्रिलला लाइट बंद करुन ‘बत्ती गुल’ कार्यक्रमात सहभागी होण्याच आवाहन केलं.

अजित पवारांवर साधला निशाणा

वक्फ संशोधन विधेयकाच समर्थन केल्याबद्दल ओवैसीनी अजित पवार, नितीश कुमार, जयंत चौधरी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर निशाणा साधला. मुस्लिम आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेचे लोक त्यांना माफ करणार नाहीत, असं ते म्हणाले.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत