AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना किती रुपयांची भरपाई मिळणार? काय आहे कायदा? वाचा…

एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता मृत प्रवाशांच्या मृत कुटुंबियांना आर्थिक भरपाई दिली जाणार आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना किती रुपयांची भरपाई मिळणार? काय आहे कायदा? वाचा...
plane crash insurance
| Updated on: Jun 12, 2025 | 9:23 PM
Share

अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. यात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या या विमान अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता मृत प्रवाशांच्या मृत कुटुंबियांना आर्थिक भरपाई दिली जाणार आहे. याबाबत काय कायदा आहे? मृतांच्या कुटुंबियांना किती रुपये मिळणार याबाबत माहिती जाणून घेऊयात.

विमान अपघातातबाबत भरपाईबाबतचे नियम काय आहेत?

विमानाने प्रवास करणे सोयीस्कर आहे मात्र ते धोकादायक देखील आहे. एक छोटी शेकडो लोकांच्या मृत्यूचे कारण बनू शकते. त्यामुळे विमान कंपन्या आणि डीजीसीएने काही कठोर नियम बनवले आहेत.देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी हे नियम वेगळे आहेत ते जाणून घेऊयात.

१.४ कोटी रुपयांची भरपाई

भारतात कार्यरत विमान कंपन्या १९९९ च्या मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन कायद्याला बांधील आहेत. याअंतर्गत आंतरराष्ट्रीय प्रवासात प्रवाशाचा मृत्यू झाला किंवा शारीरिक दुखापत झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक प्रवाशाला सुमारे १.४ कोटी रुपये दिले जातात. तसेच अपघात विमान कंपनीच्या चुकीमुळे झाला असेल या रकमेत आणखी वाढ होऊ शकते.

विम्याची रक्कम वेगळी

विमानप्रवास करताना अनेक विमान कंपन्या प्रवाशांचा विमा उतरवतात. यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मिळते. तसेच कायमचे अपंगत्व आल्यास ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाते.

टाटाकडून 1-1 कोटींची मदत

या अपघातात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना टाटा सन्सकडून भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. टाटा सन्सने याबाबत केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना टाटा ग्रुप १ कोटी रुपयांची मदत देईल. आम्ही जखमींचा वैद्यकीय खर्च देखील उचलू आणि त्यांना आवश्यक असलेली सर्व मदत मिळेल याची खात्री करू. तसेच आम्ही बीजे मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करू. या अकल्पनीय घटनेत आम्ही बाधित कुटुंबांसोबत उभे आहोत.”

Follow Us
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...