AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगभरात भारताचा विकास दर सर्वाधिक, अमेरिकन अब्बाधीश उद्योगपतीचा विश्वास

जागतिक राजकारणात भारत हा निष्पक्ष देश आहे. भारताच्या या भूमिकेचा त्यांना फायदा होणार आहे. जगभरात भारताचा विकास दर सर्वाधिक असणार आहे.

जगभरात भारताचा विकास दर सर्वाधिक, अमेरिकन अब्बाधीश उद्योगपतीचा विश्वास
भारताचा विकास दर वाढणार
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 17, 2023 | 9:11 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात जगभरात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. सर्व जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. अमेरिकन अब्जाधीश रे डॅलिओ (Ray Dalio) यांनी भारतासंदर्भात मोठे विधान केले आहे. जगभरात भारताचा विकास दर इतर देशांच्या तुलनेत सर्वात चांगला असणार आहे, असे वक्तव्य रे डॅलिओ यांनी केले आहे. दुबईत वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दरम्यान ते बोलत होते. सरकार आणि बदलते जग या सत्रात त्यांनी हे वक्तव्य केले असल्याचे गल्फ न्यूजने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. डॅलियो ब्रिजवॉटर असोसिएट्सचे संस्थापक आहेत.

युद्धापासून दूर राहणार्‍या देशांना फायदा

डॅलियो पुढे म्हणाले की, भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. मागील दहा वर्षांपासून मी अभ्यास करत आहे. त्यानुसार आपण जे पाहत आहोत, त्यात भारताचा विकास दर सर्वाधिक आणि वेगवान असणार आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत देशात सर्वात मोठा बदल होणार आहे.

जागतिक राजकारणात भारत हा निष्पक्ष देश आहे. भारताच्या या भूमिकेचा त्यांना फायदा होणार आहे. जगभरात भारताचा विकास दर सर्वाधिक असणार आहे. युएईचे कॅबिनेट मंत्री मोहम्मद बिन अब्दुल्ला अल गेर्गावी यांच्याशी बोलताना ते म्हणाले जे देश युद्धापासून दूर राहतील त्यांना फायदा होईल.

भारताची परिस्थिती चांगली

अमेरिकन अब्जाधीश डॅलियो पुढे म्हणाले की, भारताची परिस्थिती खूपच चांगली आहे. येथे व्यवसायासाठी खूप चांगले आणि सोपे वातावरण नाही, परंतु त्यात बदल होईल. युरोपबद्दल विचारले असता ते म्हणाले की, हे पर्यटन आणि येथील सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी चांगले ठिकाण आहे.

अर्थसंकल्पात काय म्हटले होते

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्यात भरताचा विकास दर ६.५ टक्के असेल असे नमूद केले आहे. यापूर्वी, आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांनी भारत अनेक वर्षांपर्यंत नऊ टक्के आर्थिक विकास दर गाठू शकतो, असे म्हटले आहे.

Follow Us
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट