AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिरुपतीच्या प्रसादासाठी आम्ही तूप पुरवलं नाही, अमूलला का द्यावं लागलं स्पष्टीकरण

तिरुपती बालाजीच्या मंदिरात मिळणाऱ्या लांडूच्या प्रसादावरुन सध्या वाद रंगला आहे. हा वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी असा आरोप केला की, मागच्या सरकारच्या काळात या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि कमी दर्जाच्या वस्तू वापरल्या गेल्या. या आरोपावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे.

तिरुपतीच्या प्रसादासाठी आम्ही तूप पुरवलं नाही, अमूलला का द्यावं लागलं स्पष्टीकरण
| Updated on: Sep 21, 2024 | 7:05 PM
Share

तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाचा वाद आणखीनच चिघळत चालला आहे. तिरुपती मंदिराकडून दिल्या जाणाऱ्या प्रसाद लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याच्या दावा केल्यानंतर आता अमूलने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अमूलने निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानला (TTD) तूप दिले नाही. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल पोस्ट केल्यानंतर, Amul.co.pe ने ट्विटरवर एक निवेदन पोस्ट केले आणि स्पष्टीकरण दिले आहे. ज्यामध्ये अमूलने  तिरुपती मंदिराला कधीही तूप पुरवले नसल्याचे म्हटले होते. अमूलच्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही तिरुपती मंदिराला अमूल तूप कधीच पुरवले नाही. आम्ही हेही स्पष्ट करू इच्छितो की, ‘आमच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रांमध्ये अमूल तूप दुधापासून बनवले जाते, जे ISO प्रमाणित आहेत. अमूल तूप हे उच्च दर्जाच्या शुद्ध दुधाच्या फॅटपासून बनवले जाते. आमच्या दुग्धशाळांमधून खरेदी केलेल्या दुधाची FSSAI द्वारे निर्दिष्ट केल्यानुसार भेसळ शोधण्यासह कठोर गुणवत्ता तपासणी केली जाते. सोशल मीडियावर अमूलकडून तूप पुरवल्या गेल्याची पोस्ट व्हायरल होत असल्याने कंपनीला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.

लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दावा केल्यानंतर दोन दिवसांनी अमूलचे हे स्पष्टीकरण आले आहे. जगन मोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारच्या काळात तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरातून दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीसह निकृष्ट घटकांचा वापर करण्यात आला होता. असा आरोप करण्यात आला आहे. तिरुपती लाडू प्रकरणाला उत्तर देताना आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी म्हणाले की, टीडीपी धार्मिक बाबींचे राजकारण करत आहे.

जगन मोहन रेड्डी यांची सरकारवर टीका

जगन मोहन रेड्डी म्हणाले की, निविदा प्रक्रिया दर सहा महिन्यांनी होते आणि पात्रतेचे निकष अनेक दशकांपासून बदललेले नाहीत. पुरवठादाराने NABL प्रमाणपत्र आणि उत्पादन गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करणे आवश्यक आहे. टीटीडी तुपाचे नमुने घेते आणि फक्त तेच पदार्थ वापरले जातात जे प्रमाणन प्रक्रिया पास करतात. टीडीपी धार्मिक बाबींचे राजकारण करत आहे. आमच्या नियमानुसार, आम्ही 18 वेळा उत्पादने नाकारली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री नायडू यांच्याशी बोलून या विषयावर संपूर्ण अहवाल मागवला. केंद्र सरकार या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करेल, असे ते म्हणाले.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.