AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनंत अंबानी यांनी बागेश्वर बाबांना आणण्यासाठी या देशात पाठवले खास विमान, म्हणाले तुम्ही फक्त तयार राहा…

बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांची सध्या देशभरात चर्चा आहे. मुंबईत देखील त्यांची लोकप्रियता खूप वाढली आहे. अनंत अंंबानींच्या लग्नात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रण पाठवण्यात आले होते. पण जेव्हा त्यांनी निमंत्रण पाठवले तेव्हा ते परदेशात होते. त्यामुळे अनंत अंबानी यांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवले होते.

अनंत अंबानी यांनी बागेश्वर बाबांना आणण्यासाठी या देशात पाठवले खास विमान, म्हणाले तुम्ही फक्त तयार राहा...
| Updated on: Jul 15, 2024 | 7:26 PM
Share

अनंत अंबानी यांच्या लग्नात जगभरातील अनेक मोठी लोकं सहभागी झाली होती. जागातील अनेक लोकांना यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. अंबानी कुटुंबाने देशभरातील संतांना देखील आमंत्रित केले होते. या लग्नाला बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही हजेरी लावली होती. अनंत अंबानी यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना ऑस्ट्रेलियाहून मुंबईत आले होते. यासाठी अनंत अंबानी यांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवले होते. नियोजित कार्यक्रमानुसार, बाबा 17 जुलैपर्यंत ऑस्ट्रेलियात त्यांचा कार्यक्रम होता. पण ते 13 जुलै रोजी अंबानींच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आले होते. यानंतर ते पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतले.

ऑस्ट्रेलियात सुरु होती कथा

पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना अनंत अंबानी यांच्या आशीर्वाद समारंभाचे निमंत्रण मिळाले तेव्हा ते ऑस्ट्रेलियात कथा करत होते. सुरुवातीला ते ऑस्ट्रेलियात असल्यामुळे येऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र अंबानी कुटुंबाने त्यांच्यासाठी खास विमान पाठवले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही त्यांना सांगितले की आम्ही नंतर आशीर्वाद देऊ. पण त्यांना ते मान्य नव्हते. ते म्हणाले की, गुरुजी, तुम्ही कथा सांगा, प्रायव्हेट जेट तुमच्यासाठी तयार राहिल.

विशेष विमानाने आले मुंबईत

धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की, ते विशेष विमानाने मुंबईत आले होते. 12 तासांच्या प्रवासानंतर मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम प्रसाद घेतला. संध्याकाळी सर्व संतांसह त्यांनी शंकराचार्यजींकडून आशीर्वाद घेतला आणि अनंत-राधिका यांनाही आशीर्वाद दिला आणि तेथून निघाले.

बाबा मुंबईत लोकप्रिय

अंबानी कुटुंबाच्या या विशेष सोहळ्यात देशातील अनेक नामवंत व्यक्ती आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरही सहभागी झाले होते. पण या सगळ्यांमध्ये बागेश्वर बाबा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री स्वतःचा वेगळा ठसा उमटवत आहेत. संपूर्ण विवाह सोहळ्यावर त्यांनी वर्चस्व गाजवले. त्यांनी अनेक बड्या व्यक्तींची भेट घेतली. चित्रपटसृष्टीपासून ते व्यावसायिक जगतापर्यंतचे लोक येथे आले होते. अमिताभ बच्चन यांना देखील  भेटताना ते दिसत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही त्यांचे आशीर्वाद घेतले.

Follow Us
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.
आता म्हणतील अ‍ॅसिड हल्ला झालाच नाही, संजय राऊत यांची जळजळीत टीका
आता म्हणतील अ‍ॅसिड हल्ला झालाच नाही, संजय राऊत यांची जळजळीत टीका.
सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?; शेगावात डिझेल संपलं,....
सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?; शेगावात डिझेल संपलं,.....
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत.
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय.
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार.
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी.
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.