AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हायकोर्टाचा अवमान 8 आयएएस अधिकाऱ्यांना महागात, 14 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावताच ऑफिसर नरमले, नेमकं प्रकरण काय?

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) हायकोर्टानं आज न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) केल्याप्रकरणी 8 आयएएस अधिकाऱ्यांना (IAS Officers) दोषी ठरवलं आहे.

हायकोर्टाचा अवमान 8 आयएएस अधिकाऱ्यांना महागात, 14 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावताच ऑफिसर नरमले, नेमकं प्रकरण काय?
महिला पोलीस कॉन्स्टेबलला थप्पड मारणारी महिला निर्दोषमुक्तImage Credit source: टीव्ही9
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Mar 31, 2022 | 6:34 PM
Share

विजयवाडा : आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) हायकोर्टानं आज न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) केल्याप्रकरणी 8 आयएएस अधिकाऱ्यांना (IAS Officers) दोषी ठरवलं आहे. हायकोर्टानं अधिकाऱ्यांना 2 आठवड्याचा तुरुंगवास सुनावला आहे. अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर हायकोर्टानं निकालपत्रात बदल केला. आठ आयएएस अधिकाऱ्यांना वर्षातील प्रत्येक महिन्यात एक दिवस कल्याणकारी हॉस्टेलमध्ये सामाजिक सेवा करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अधिकाऱ्यांना कोर्टाचा एका दिवसाचा खर्च देण्यास सांगण्यात आलं आहे. हायकोर्टानं यापूर्वी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना शाळांच्या ठिकाणी ग्रामसचिवालय बांधण्यास मनाई केली होती. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली होती. हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याचं याचिकाकर्त्यांनी कोर्टाच्या लक्षात आणून दिलं यानंतर हायकोर्टानं आयएएस अधिकाऱ्यांना फटकारलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

हायकोर्टानं आयएएस अधिकारी गोपाल कृष्ण द्विवेदी, बुदिती राजशेखर, विजया कुमार, श्यामला राव, श्री लक्ष्मी, गिरीजा शंकर, वी. छिन्ना वीरबंडारू, एनएम नायक यांच्यावर हायकोर्टानं संताप व्यक्त केला. या आयएएस अधिकाऱ्यांना कोर्टाचा आदेश नाकारला होता. यानंतर संतप्त झालेल्या हायकोर्टानं अधिकाऱ्यांना दोन आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

एएनआयचं ट्विट

आयएएस अधिकाऱ्यांनी माफी मागितली

हायकोर्टानं यापूर्वी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना शाळांच्या ठिकाणी ग्रामसचिवालय बांधण्यास मनाई केली होती. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांनी यानंतर आंध्र प्रदेश हायकोर्टाचा आदेश डावलण्यात आल्याची बाब लक्षात अणून दिली. त्यांसदर्भातील पुरावे देखील कोर्टात सादर करण्यात आले होते. यानंतर हायकोर्टानं आयएएस अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. यानंतर आयएएस अधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे.

इतर बातम्या

MPSC आयोगाला शिवीगाळ करणे विद्यार्थ्याला महागात ; राज्यातील चार विद्यार्थ्यांवर आयोगाने घातली बंदी ; काय आहे प्रकरण

टायगर इज बॅक नाहीतर भालू इज बॅक, ‘नाणार’वरून सतीश सावंतांचे नितेश राणेंवर जहाल आसूड

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?