AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian army : युद्ध झाल्यास 1971 सारखे हाल करू, मराठमोळ्या लष्करप्रमुखांची डरकाळी

भारत पाकिस्तान युद्धावर बोलताना लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला कडकडीत इशारा दिला आहे. मी कुणाशी भांडत नाही. पण युद्ध झाल्यास 1971 सारखी पाकिस्तानची गत तिन्ही सेना मिळून करतील, असं लष्करप्रमुख नरवणे म्हणाले आहेत.

Indian army : युद्ध झाल्यास 1971 सारखे हाल करू, मराठमोळ्या लष्करप्रमुखांची डरकाळी
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 6:54 PM
Share

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेलं 1971 चं युद्ध कोणताही भारतीय कधीच विसरू शकणार नाही. त्या युद्धात झालेला दारुण पराभव पाकिस्तानही कधीच विसरू शकणार नाही. 1971च्या युद्धानं भारताचा इतिहास बदलून दाखवला. आणि पाकिस्तानचे टुकडे झाले. नवा बांगलादेश उदयाला आला. म्हणून या युद्धाला भारताच्या इतिहासात खास महत्व आहे. या युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सेनाप्रमुख मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

युद्ध झाल्यास 1971 सारखी गत करु

भारत पाकिस्तान युद्धावर बोलताना लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला कडकडीत इशारा दिला आहे. मी कुणाशी भांडत नाही. पण युद्ध झाल्यास 1971 सारखी पाकिस्तानची गत तिन्ही सेना मिळून करतील, असं लष्करप्रमुख नरवणे म्हणाले आहेत. 1971 च्या युद्धावेळी मनोज नरवणेंचे वडील दिल्लीत तैनात होते. मनोज नरवणे केवळ 11 वर्षांचे होते. तेव्हा कधी लष्करप्रमुख होईल असा विचारही केला नव्हता, असंही ते म्हणालेत.

मराठमोळ्या लष्करप्रमुखांची वाघर्गजना

लष्करप्रमुख मनोज नरवणे मराठमोळे आहेत. त्यांच्या लष्करप्रमुख होण्याने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. 1971 च्या युद्धाला 9 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मनोज नरवणे लष्करात भरती झाले. त्यावेळी त्यांना दिलेल्या एका पुस्तकाच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या आहेत. त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानात 1971 च्या युद्धाची माहिती होती. भारतीय सेनेने त्यावेळी तयारीवर खूप चांगला भर दिला होता, त्यामुळेच 1971 च्या युद्धात पाकिस्तानला नमवून एवढा मोठा विजय प्राप्त करणे शक्य झाले. आता युद्ध कसोटी सामन्यासाारखं नाही तर टी-20 सामन्यासारखं झालं आहे. आता तयारीला एवढा वेळ मिळणार नाही, असंही ते म्हणालेत.

Omicron Symptoms | ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये नेमकी कोणती लक्षणं आढळली?

Nagpur Crime चोरी करायला आले, मार खाऊन गेले, वाचा कसा घडला थरार!

‘मेस्मा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो, एसटी अत्यावश्यक सेवेत येते’, अनिल परबांचा सूचक इशारा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.