AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील नागरिक कोरोनानं त्रस्त, प्रत्येकाला मोफत लस मिळावी: अरविंद केजरीवाल

मोफत कोरोना लस हा प्रत्येक भारतीयाचा हक्क असल्याचं वक्तव्य नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. (Arvind Kejriwal said free corona vaccine is right of each Indian citizen)

देशातील नागरिक कोरोनानं त्रस्त, प्रत्येकाला मोफत लस मिळावी: अरविंद केजरीवाल
| Updated on: Oct 24, 2020 | 5:41 PM
Share

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी “देशातील सर्व जनतेला कोरोना लस मोफत मिळाली पाहिजे. सर्व देशवासियांचा तो अधिकार आहे. प्रत्येक नागरिक कोरोनामुळे त्रस्त आहे, यामुळे मोफत कोरोना लस मिळणे गरजे आहे.” असं म्हटलं आहे. जेव्हा कोरोनावर लस उपलब्ध होईल तेव्हा त्याची किमंत किती असेल ते पाहिले जाईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. (Arvind Kejriwal said free corona vaccine is right of each Indian citizen)

अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते आज शास्त्रीनगर-सीलमपूर उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त केजरीवालांनी दिल्लीतील जनतेला शुभेच्छा दिल्या. शास्त्रीनगर आणि सीलमपूर उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे आईएसबीटी ते उत्तर प्रदेश सीमेवर जाण्याचा मार्ग सुकर होईल, असं केजरीवाल म्हणाले. यापूर्वी येथून जाताना जनतेला त्रास सहन करावा लागत होता मात्र, आता त्यातून सुटका होणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.

शास्त्री नगर आणि सीलमपूर येथील उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या पीडब्ल्यूडी विभागाचे केजरीवालांनी कौतुक केले. 303 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असणाऱ्या पुलाचे काम 250 कोटी रुपयांमध्ये पूर्ण करण्यात आले. दिल्लीचे 53 कोटी रुपये वाचवण्यात आल्याची माहिती केजरीवालांनी दिली.

कांद्याच्या वाढत्या किमंतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्हाला काम करण्याची गरज आहे. आम्ही आवश्यक ते प्रयत्न करु, असं केजरीवाल म्हणाले. देशामध्ये सर्वत्र कांद्याच्या किमती वाढत आहेत. कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रसरकारने हस्तक्षेप करणं गरजेचे आहे. तरच देशातील कांदा दर नियंत्रित होतील असं केजरीवालंनी म्हटले.

शिक्षणाला आम्ही आजपर्यंत प्राथमिकता दिली आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी जे करता येईल ते सरकार म्हणून करु, असं केजरीवाल म्हणाले.

संबंधित बातम्या:

यूपी सरकारनं दोषींना कठोर शिक्षा द्यावी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

Exam Controversy | कोरोनाकाळात परीक्षांवरुन राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आक्रमक

(Arvind Kejriwal said free corona vaccine is right of each Indian citizen)

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....