AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न होत नसल्याने रिक्षावाल्याचा अजब जुगाड, पाहाल तर म्हणाल काय आयडीया आहे

प्रत्येकाला वाटते की योग्य वयात नोकरी लागावी, लग्न व्हावे आणि चारचौघांसारखा संसार थाटावा. परंतू हल्ली नोकरी मिळायला होत असलेला उशीर किंवा स्वावलंबी होण्यात लग्नाचे वय टळून जाते. त्यामुळे नातलगाचं टोमणे ऐकावे लागतात. परंतू एका तरुणाने या समस्येवर एक आयडीया शोधून काढली आहे. आता त्याला स्थळं येत आहेत.

लग्न होत नसल्याने रिक्षावाल्याचा अजब जुगाड, पाहाल तर म्हणाल काय आयडीया आहे
AUTO DRIVERImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 23, 2024 | 5:11 PM
Share

मध्य प्रदेश | 23 फेब्रुवारी 2024 : वयात आलेल्या व्यक्तीला मग ती पुरुष असो की महिला वेळीच लग्न व्हावे, संसार थाटावा, संसाराच्या वेलीवर एखादं फुल यावं अशी चारचौघांसारखी इच्छा असते. जर एखाद्याचं लग्नाचं वय उलटले तरी लग्न होत नसेल तर शेजारी पाजारी आणि नातेवाईक टोमणे मारायला लागतात. त्यामुळे लग्नाळु मुला-मुलींची अवस्था वाईट होते. अशा एका मध्य प्रदेशातील दमोह येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा विवाह होत नसल्याने त्याने एक भन्नाट आयडीया केली आणि आता तो रातोरात प्रसिद्ध झाला असून त्याला आता स्थळं देखील येऊ लागली आहेत.

मध्य प्रदेशातील या तरुणाचे नाव दीपेंद्र राठोड याचं देखील लग्न जुळत नव्हतं. दीपेंद्र ई-रिक्षा चालवतो. त्याचं वय वाढले तरी त्याचं लग्न काही केल्याने होत नसल्याने तो नाराज झाला आहे. मग त्याने यावर एक उपाय केला, त्याने आपला परिचय आणि फोटो लिहीलेले मोठे होर्डींग्ड तयार केले. हे होर्डींग त्याने त्यांच्या ई-रिक्षावर लावले आहे. त्याने या होर्डींगवर त्याचे शिक्षण, उंची, रक्त गट लिहीला आहे. आता आपली ई-रिक्षा तो शहरभर फिरवित असल्याने त्याचा आपोआप प्रचार होत आहे.

मग केला असा जुगाड

दीपेंद्र त्याची ई- रिक्षा जेथे घेऊन जातो तेथे त्याच्या होर्डींगवरील सर्व माहीती लोक वाचू लागतात. त्यामुळे शहरात त्याची चर्चा सुरु आहे. आपण 30 वर्षांचे झालो तर आपल्या कोणतेही स्थळ आलेले नाही. आपलेही लग्न व्हावे अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण हा पर्याय निवडल्याचे त्याचे म्हणणे आहे. दीपेंद्र याने होर्डींगवर एक खास बाब लिहीली आहे, त्याने विवाहासाठी हवी असलेली वधू कोणत्याही जातीची किंवा धर्माची असली तरी आपली काही हरकत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. दीपेंद्र याच्या मते त्यांच्या नातेवाईकांनी त्याच्या लग्नासाठी अनेकदा बोलणी करुन पाहीली तरी काही उपयोग झाला नाही. दर वेळी काही ना काही कारणाने त्याचा भ्रमनिरास व्हायचा. लग्न न झाल्याने लोक त्याला टोमणे मारु लागले, अखेर त्याने हा उपाय योजला. त्याने सरळ आपल्या रिक्षावरच आपला बायोडाटा लावून टाकला. आता त्याला स्थळ येत आहेत. लवकरच त्याचे लग्न होईल अशी त्याला आशा वाटत आहे.

सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.