AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मणिपूरच्या अतिरेकी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यासह 5 जवान शहीद, पत्नी आणि मुलाचाही मृत्यू

मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यीतल सिंघाट येथे ही घटना घडली. आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.

मोठी बातमी! मणिपूरच्या अतिरेकी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यासह 5 जवान शहीद, पत्नी आणि मुलाचाही मृत्यू
प्रतिकात्मक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 4:26 PM
Share

नवी दिल्ली: मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांच्या तुकडीवर आयईडी हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी जवानांवर हल्ला करण्यासाठी परिसरात दबा धरून बसले होते. जवान टप्प्यात येताच त्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आसाम रायफल्सचे अनेक जवान जखमी झाले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशानं पाच धाडसी वीर गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यीतल सिंघाट येथे ही घटना घडली. आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये कमांडिंग ऑफिसर त्याची पत्नी, मुलगा  , शीघ्र कृतीदलाचे जवान होते. कमांडिंग ऑफिसर सह आसाम रायफल्सचे चार जवान आणि कमांडिंग ऑफिसरच्या पत्नीचा आणि मुलाचा  मृत्यू झालाय, अशी माहिती आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणी ट्विट केलं आहे. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर करण्यात आलेला भ्याड हल्ला हा दुखद आणि निंदनीय आहे. संपूर्ण देशानं कमांडिंग ऑफिसर आणि त्याच्या परिवारातील दोन सदस्य आणि 5 जवांनाना गमावलं आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचं ट्विट

सर्च ऑपरेशनला सुरुवात

दरम्यान, जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर आता जवानांकडून परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.

पीपल्स लिबरेशन ऑफ मणिपूरचा हात?

पीपल्स लिबरेशन ऑफ मणिपूर संघटनेचा हात असल्याचे बोलले जात असले, तरी देखील अद्याप अधिकृतीरित्या कुठल्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मणिपूरमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीची स्थापना 1978 मध्ये करण्यात आली होती. भारत सरकारनं या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. ही संघटना भारतीय सुरक्षा दलांवर हलेल करते. या संघटनेची स्थापना बिश्वेवर सिंह यांनी केली होती.

इतर बातम्या:

मणिपूरमध्ये सैनिकांच्या तुकडीवर हल्ला; अनेक जवान जखमी

Goa Election 2022 : मागच्या वेळेस गडकरी, ह्या वेळेस फडणवीस, गोव्यात ‘कमाल’ करणार? भाजपचा मास्टरप्लॅन काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.