AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांचा नॉनव्हेजला कडाडून विरोध, म्हणाले, “या” दिवशी चिकन, मटणाची दुकाने उघडी नकोच

Ram Mandir : 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी पुणेकरही सज्ज झाले आहेत. 22 जानेवारीला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासे शॉप दुकान बंद ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

पुणेकरांचा नॉनव्हेजला कडाडून विरोध, म्हणाले, या दिवशी चिकन, मटणाची दुकाने उघडी नकोच
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभरातील जनतेला उत्सुकता आहे. विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींना या सोहळ्याचं खास आमंत्रण देण्यात आलं आहे. बुधवारपासून काही सेलिब्रिटी अयोध्येत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिरात राम ललाच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. Image Credit source: social media
| Updated on: Jan 18, 2024 | 10:52 AM
Share

पुणे | 18 जानेवारी 2024 : 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू आहे. हा दिवस संपूर्ण देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवस ठरणार असून यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशातही दिसत असून पुणेकरही यासाठी सज्ज झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात एक महत्वाची मागणी करण्यात आली आहे. 22 जानेवारीला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासे शॉप दुकान बंद ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. संघर्ष सेनेतर्फे महापालिका आयुक्तांकडे ही मागणी करण्यात आली आहे.

22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. हा उत्सव देशभर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे 22 तारखेला देशामध्ये उत्साहाचं, आनंदी वातावरण रहावं. यामुळे सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासेविक्री दुकानं एका दिवसासाठी बंद ठेवावी अशी मागणी संघर्ष सेनेने पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा अधिकारी, पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पुण्यातून अयोध्येसाठी 30 जानेवारीपासून 15 विशेष रेल्वे गाड्या

पुण्यातून अयोध्येसाठी 30 जानेवारीपासून 15 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. दोन दिवसाला एक गाडी पुण्यातून अयोध्येसाठी सुटणार आहे. त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. अयोध्येला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी भक्तांकडून केली जात होती, त्यानुसार रेल्वे प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने पुण्यातून 30 जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात 15 विशेष रेल्वे अयोध्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका गाडीमध्ये साधारण दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकणार आहेत.

Follow Us
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?