AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता टाटा हॉस्पिटल, एम्सच्या साथीने पतंजलीतर्फे उपचार होणार, बाबा रामदेव यांची मोठी घोषणा!

हरिद्वार येथे पतंजली विद्यापीठ, पतंजली संशोधन संस्था आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय अनामयम आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

आता टाटा हॉस्पिटल, एम्सच्या साथीने पतंजलीतर्फे उपचार होणार, बाबा रामदेव यांची मोठी घोषणा!
baba ramdev
| Updated on: Aug 02, 2025 | 7:36 PM
Share

Baba Ramdev : पतंजलीतर्फे आयुर्वेदाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जातात. वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असलेल्या हजारो रुग्णांवर पतंजलीने आयुर्वेदाच्याच मदतीने यशस्वीपणे उपचार केलेले आहेत. दरम्यान, पंतजली विद्यापीठाचे कुलपति बाबा रामदेव यांनी मोठी घोषणा केली आहे. आता लवकरच एम्स, टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि सर गंगा राम हॉस्पिटलच्या सहकार्याने पतंजली आयुर्वेद रुग्णालयात वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जातील, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

बाबा रामदेव यांनी कोणती घोषणा केली?

हरिद्वार येथे पतंजली विद्यापीठ, पतंजली संशोधन संस्था आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय अनामयम आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी ही घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी एम्स, टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि सर गंगा राम हॉस्पिटलच्या सहकार्याने आधुनिक पद्धतींचा वापर करून पतंजली आयुर्वेद रुग्णालयात वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जातील. विशेष म्हणजे हे उपचार कमी खर्चात केले जातील. या मोहिमेच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे.

16 राज्यांतील 300 पेक्षा अधिक प्रतिनिधींचा सहभाग

आयुर्वेद आणि आधुनिक औषधांचे एकीकरण आणि समन्वय साधण्याच्या उद्देशाने तसेच जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला देशभरातली सुमारे 16 राज्यांतील 200 शैक्षणिक संस्थांमधील 300 पेक्षा अधिक मान्यवरांनी भाग घेतला. हा सहभाग ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी होता. या परिषदेत देशातील वेगवेगळ्या प्रतिष्ठित वैद्यकी आणि शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञ, संशोधकही सहभागी झाले होते.

कार्यक्रमात वेगवेगळ्या करारांवर स्वाक्षऱ्या

या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात रामदेव बाबा, पंतजली विद्यापीठाचे कुलगुरू, आयुर्वेद शिरोमणी आचार्य बालकृष्ण तसेच अन्य पाहुण्यांनी मिळून एकूण तीन पुस्तकांचे प्रकाशन केले. आयआयटी रोपरच्या डॉ. श्रेया, डॉ. राधिका आणइ डॉ. मुकेश तसेच पंतजली विद्यापीठाचे गुलगुरु बालकृष्ण यांनी शिक्षण, संशोधनाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा