AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार जागीच सोडून डॉक्टर धावत सुटले, काही मिनिटात 3 किमी, बंगळुरूत काय घडलं?

माझी टीम ऑपरेशनसाठी तयार होती. पण वाटेत ट्रॅफिक जाम झाले. मी खूप वेळ वाट पाहिली. पण काहीच उपयोग झाला नाही. अखेर मी आणखी विचार करत बसण्यापेक्षा कार तिथेच सोडून निघालो, असं डॉक्टरांनी सांगतिलं.

कार जागीच सोडून डॉक्टर धावत सुटले, काही मिनिटात 3 किमी, बंगळुरूत काय घडलं?
Image Credit source: social media
| Updated on: Sep 12, 2022 | 12:51 PM
Share

बंगळुरूः डॉक्टरांमध्ये माणुसकी उरली नाही, असा आरोप नेहमी केला जातो. मात्र बंगळुरूतली घटना वाचून अनेकांचं मत परिवर्तन होईल. गेल्या काही दिवसांपासून बंगळुरू (Bangalore) असमानी संकटानं हैराण आहे. आयटी हब, भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळख असलेल्या बंगळुरूत पूरस्थितीने (Heavy Rain) घरात, शहरात पाणीच पाणी होतं. रस्त्यावरही पाणी (Flood) साचल्यानंतर लोकांनी होड्यांनी प्रवास केला. सध्या हे संकट काहीसं निवळलंय. पण 30 ऑगस्टमध्ये ऐन अडचणीच्या काळातला एक प्रसंग चांगलाच चर्चिला जातोय. माणुसकी अजूनही शिल्लक आहे, असं म्हटलं जातंय.

काय घडलं?

बंगळुरूत मणिपाल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर गोविंद नंदकुमार हे सर्जन आहेत. गॅस्ट्रोंट्रोलॉजीचे सर्जन. 30 ऑगस्ट रोजी एका महिलेवर इमर्जन्सी लॅप्रोस्कोपिक गॉलब्लॅडर सर्जरी करायची होती.

डॉक्टर घरातून वेळेवर निघाले. रुग्णालयात टीमने ऑपरेशनची पूर्ण तयारी केली होती. पण रस्त्यात पूरस्थितीमुळे प्रचंड ट्रॅफिक जाम झाला. सरजापूर-माराथल्लीदरम्यान अनेक गाड्या अडकून पडल्या.

खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही वाहतूक पुढे धकत नव्हती. महिलेचं ऑपरेशन वेळेवर करणं गरजेचं होतं. अन्यथा तिच्या जीवावर बेतणार होतं.

डॉक्टरांना काय करावे काहीच सूचत नव्हते. अखेर त्यांनी कार तिथेच सोडली आणि रुग्णालयापर्यंत धावत सुटले.

डॉक्टर गोविंद सलग 3 किमी अंतर धावत गेले. रुग्णालय गाठलं. ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन आपलं कर्तव्य बजावलं.

ऑपरेशनची टीम सज्ज होती. डॉक्टर वेळेवर पोहोचले. ते ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचताच रुग्णाला अॅनस्थेशिया दिला गेला.

वेळेवर उपचार झाल्याने रुग्णाचे प्राण वाचले. आज सदर महिलेला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. तिचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांची आज चर्चा होतेय.

या प्रसंगाविषयी सांगताना डॉक्टर म्हणाले, ‘ मी दररोज मध्य बंगळुरूतील सारजापूर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये जातो. ते दक्षिण पूर्व बंगळुरूत आहे. त्या दिवशीही मी वेळेत घरून निघालो. माझी टीम ऑपरेशनसाठी तयार होती. पण वाटेत ट्रॅफिक जाम झाले. मी खूप वेळ वाट पाहिली. पण काहीच उपयोग झाला नाही. अखेर मी आणखी विचार करत बसण्यापेक्षा कार तिथेच सोडून निघालो. कारमध्ये ड्रायव्हर होता, त्यामुळे काही प्रश्न आला नाही…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं.
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य.
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल.
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य.
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल.
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान.
आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला! राऊतांचा दावा
आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला! राऊतांचा दावा.