AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघाला पैसा येतो कुठून? मोहन भागवतांनी उदाहरणासह दिलं उत्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी संघाला कुठून पैसा येतो, या प्रश्नाचं उत्तर एका उदहरणासह दिलं.

संघाला पैसा येतो कुठून? मोहन भागवतांनी उदाहरणासह दिलं उत्तर
Mohan BhagwatImage Credit source: ANI
| Updated on: Feb 08, 2026 | 12:29 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) 100 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील विविध शहरांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. मुंबईतही एक कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी परिस्थितीवर नाही तर काम कसं करायचं यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं सांगितलं. “परिस्थितीचा अधिक विचार करण्यात फायदा नाही. आहे त्या परिस्थिती काय उपाय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. स्वयंसेवक असा विचार करतो. संपूर्ण आयुष्यात आपत्तीचा विचार करू नका. परिस्थिती असते. परिस्थिती येते आणि जाते. आज अशी आहे, उद्या वेगळी असेल. आपण तर तेच असतो. मला त्या परिस्थितीत कसं काम केलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे,” असं ते म्हणाले.

“संघाचे स्वयंसेवक असंच काम करतात. अनेक ठिकाणी संकटं होती, तिथे काम केलं. काही ठिकाणी लवकर झालं, तर काही ठिकाणी वेळ लागला. त्या परिस्थितीवर काय उपाय केला पाहिजे याचा विचार केला. त्यामुळे काम पूर्ण झालं. नव्या परिस्थितीत भ्रम फैलावला जातो. संघाबाबत हे फार झालं. जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत भ्रमाची स्थिती कायम राहते. सत्य समोर येताच भ्रम आपोआप दूर होतो. आमचं काम संस्काराचं आहे, प्रचाराचं नाही. प्रचारात आम्ही मागे आहोत. प्रचार करता करता प्रचार करणाऱ्यांवरही काही परिणाम होतो. प्रचार केला तर प्रसिद्धी होते. प्रसिद्धी झाल्यावर अहंकार वाढतो. त्यापासून वाचणं हे आवश्यक असतं. प्रसिद्धी पावसासारखी असते. जिथे जेवढी पाहिजे, तेवढीच झाली पाहिजे. कमी झाली तर खराब आणि जास्त झाली तरी खराब आहे. त्यामुळे प्रचार कार्याचा केला पाहिजे, व्यक्तीचा करू नये. जिथे जेवढा आवश्यक आहे, तेव्हाच करावा. असं आम्ही चालतो, म्हणून आम्ही मागे आहोत. पण त्यातही जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. वेबसाईट आणि संपर्कातून आम्ही काम करत आहोत,” असं भागवतांनी स्पष्ट केलं.

“एका मोठ्या मासिकाचे संपादक संघाच्या विरोधत होते. ते मला भेटायला आले. त्यांना मी सर्व सांगितलं. तरीही त्यांचे प्रश्न अनुत्तरीत राहिले. आता उत्तर तरी किती देणार? मी त्यांना नागपूरच्या संघाच्या वर्गाला बोलावलं. तिथे ते दोन दिवस राहिले, तेव्हा त्यांचे सर्व प्रश्न संपले. तरीसुद्धा त्यांचा एक प्रश्न होताच. संघाला पैसा येतो कुठून हा त्यांचा प्रश्न. मी सांगतो स्वयंसेवक संघ चालवण्यासाठी गुरु दक्षिणा देतात. सेवा चालवण्यासाठी आम्ही समाजाकडून मदत घेतो. पण त्यांना विश्वास बसत नव्हता. आम्हाला पैसा कमी येतो. जेवढा पैसा वाचवायचा तेवढा वाचवतो. आम्ही प्रवास करतो. त्यावेळी जेवणासाठी बाहेर खर्च करत नाही. आम्ही घरांमधून जेवण मागवतो. आम्ही हॉटेलात राहत नाही. घरात किंवा कार्यालयात राहतो. समाजाचा जो नॉर्मल बजेट आहे. त्यापेक्षा आमचा बजेट कमी आहे. आम्ही आमच्यात संघ घेऊन भेटतो. ही गोष्ट जेव्हा प्रत्यक्ष लोक पाहतात, तेव्हा त्यांचा भ्रम दूर होतो. आत येऊन तुम्ही संघाला पाहा असं आम्ही सांगतो. एक चमचा साखर खालल्यावर साखर गोड आहे हे तेव्हाच कळतं,” असं भागवत पुढे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं.
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य.
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल.
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य.
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल.
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान.
आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला! राऊतांचा दावा
आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला! राऊतांचा दावा.