जे ठाकरेंचं झालं, तेच ममता बॅनर्जींचं… पक्षात मोठी फूट, 58 आमदारांच्या गटाला तडकाफडकी मंजुरी
मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तब्बल 58 आमदारांचा एक गट पक्षातून बाहेर पडला आहे. पक्षात उभी फूट पडली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. 58 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी देण्यात आली आहे. हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 58 आमदारांचा गट हा पक्षातून बाहेर पडला आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी उठाव केला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. 58 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी मिळाली आहे. ऋतब्रत बॅनर्जी हे या 58 आमदारांच्या गटाचे नेते आहेत. 58 आमदारांचा गट हा तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेला आहे. काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक झाली. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होती. या निवडणुकीमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा मोठा पराभव केला. स्वत: ममता बॅनर्जी यांना देखील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपचे सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले, त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे, तब्बल 58 आमदाराचा गट तृणमूलमधून बाहेर पडला आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या आमदाराच्या गटानं बंडखोरी केली आहे, त्यानंतर या 58 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी देखील मिळाली आहे.
महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जशी फूट पडली होती, तशीच फूट आता ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षात पडली आहे. तब्बल 58 आमदार पक्षातून बाहेर पडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होऊन अद्याप एकही महिना झाला नाहीये, एक महिन्याच्या आतच तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तृणमूलच्या 58 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत आज सकाळीच विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली होती. ऋतब्रत बॅनर्जी यांनी आम्हाला 58 आमदारांचा पाठिंबा आहे, असा दावा केला होता. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांकडून 58 आमदारांच्या गटाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांच्या पक्षात उभी फूट पडली आहे.
