AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तृणमूलचा भाजपला मोठा धक्का, ममता बॅनर्जींचं जोरदार कमबॅक, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेनंतर दोनच महिन्यात वारं फिरलं

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता, भाजपला मोठं यश मिळालं होतं. मात्र आता राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.

तृणमूलचा भाजपला मोठा धक्का, ममता बॅनर्जींचं जोरदार कमबॅक, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेनंतर दोनच महिन्यात वारं फिरलं
Mamata BanerjeeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 20, 2026 | 8:54 AM
Share

दोन महिन्यांपूर्वी पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला तर तृणमूलला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच, तृणमूलमध्ये मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. तृणमूल जवळपास ममता बॅनर्जी यांच्य हातातून निसटल्याचं पहायला मिळत आहे. आधी आमदारांनी पक्षातून बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर 20 खासदार देखील पक्षातून फुटले, तृणमूलला अशाप्रकारे एकामागून एक झटके बसत असताना आता पक्षासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. भाजपला मोठा धक्का बसला आहे.

तृणमूल काँग्रेसने बार काउंसिलच्या निवडणुकीत आपला दबदबा पुन्ह एकदा कायम राखत, भाजपला धक्का दिला आहे. 23 जागांपैकी 15 जागा या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपला मात्र या निवडणुकीत पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपला या निवडणुकीत केवळ तीनच जागा जिंकता आल्या आहेत. बार काउंसिलच्या 23 जागांसाठी ही निवडणूक झाली, या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. बार काउंसीलच्या निवडणुकीत 23 पैकी 15 जागा जिंकून तृणमूलने सत्ता कायम ठेवली आहे, तर दुसरीकडे या निवडणुकीत भाजपला मात्र पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपला या निवडणुकीत केवळ तीनच जागा जिंकता आल्या आहेत. तर काँग्रेसला दोन जागा मिळल्या आहेत.

गेल्या निवडणुकीत काय होतं चित्र?

भाजपला गेल्या निवडणुकीत देखील तीनच जागा मिळाल्या होत्या, याही निवडणुकीत तीनच जागा मिळाल्या आहेत. मात्र यावेळची स्थिती वेगळी होती, कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मोठं यश मिळालं आहे. तृणमूल काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला होता. मात्र असं असताना देखील या निवडणुकीत भाजपचा फार काही प्रभाव पडू शकला नाही, भाजपच्या अवघ्या तीनच जगा निवडून आल्या आहेत, तर तृणमूलला या निवडणुकीत मोठं यश मिळालं असून, तृणमूल काँग्रेसचे उमदेवार 15 जगांवर विजयी झाले आहेत.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?