AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election 2025 Exit Poll : बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष कोणता? भाजप, जेडीयू की आरजेडी? एक्झिट पोलचा हादरवणारा अंदाज

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलेले आहे. आता बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार, हे सांगणारे एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे धक्कादायक आहेत असे म्हणावे लागेल.

Bihar Election 2025 Exit Poll : बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष कोणता? भाजप, जेडीयू की आरजेडी? एक्झिट पोलचा हादरवणारा अंदाज
bihar vidhan sabha election exit poll
| Updated on: Nov 11, 2025 | 7:22 PM
Share

Bihar Election Exit Polls : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलेले आहे. मतदानाच प्रक्रिया संपल्यानंतर आता येथे कोणाचे सरकार येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी बिहारमधील स्थानिक तसेच काँग्रेस आणि भाजपा यासारख्या राष्ट्रीय पक्षांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न केला होता. आत मतदान संपले असून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोलचे आकडे दिलेले आहेत. असे असतानाच आता काही ठिकाणी आरजेडी हा पक्ष सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.

एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

बिहारची निवडणूक संपल्यानंतर आता वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यातील चाणक्य संस्थेच्या एक्झिट पोलनुसार लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव यांचा आरजेडी हा पक्ष सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरू शकतो. या प क्षाला 75 ते 80 जागा मिळू शकतात. त्यानंतर भाजपा हा पक्ष दुसऱ्या क्रमांवर येऊ शकतो. या पक्षाला एकूण 70 ते 75 जागा मिळू शकतात असा अंदाज चाणक्य संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.

मॅट्रिझ आएएनएस संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये काय आहे?

मॅट्रिझ आएएनएस संस्थेच्या एक्झिट पोलनुसार बिहारचे विद्यामान मुख्यमंत्री नितीश कुमार याचा जेडीयू हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. या पक्षाला एकूण 67 ते 75 जागा मिळू शकतात. त्यानंतर भाजपा हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता मॅट्रिझ आयएएनएसने व्यक्त केली आहे. भाजपाला 65 ते 73 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर आरजेडी पक्षाला एकूण 53 ते 58 जागा मिळण्याची शक्यता चाणक्य मॅट्रिझ आयएएनएसच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलीय.

नितीश कुमार यांचा पक्ष ठरणार सर्वात मोठा?

पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार जेडीयू सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरू शकतो. या पक्षाला 67 ते 75 जागा मिळू शकतात. त्यानंतर भाजपा हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो. या पक्षाला 65 ते 73 जागा मिळू शकतात. राजदला 53 ते 58 जागा मिळण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक