AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Politics : एकाचवेळी 100 नगरसेवकांचा राजीनामा आणि सहा आमदार पोहोचले.. ममता बॅनर्जी यांना मोठा झटका

West Bengal Politics : सत्ता जाताच पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांचे बुरे दिन सुरु झाले आहेत. पक्षातंर्गत मोठा असंतोष खदखदत आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तृणमुल काँग्रेसचा दारुण पराभव केला.

West Bengal Politics : एकाचवेळी 100 नगरसेवकांचा राजीनामा आणि सहा आमदार पोहोचले.. ममता बॅनर्जी यांना मोठा झटका
Mamata Banerjee
| Updated on: May 27, 2026 | 7:46 AM
Share

बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर तृणमुल काँग्रेस अंतर्गत मोठा असंतोष खदखदत आहे. हळूहळू या असंतोषाचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम तृणमुल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर टीएमसीच्या ताब्यात असलेल्या नगर पालिकांमध्ये अंतर्गत कलहांमुळे सामूहिक राजीनामा सत्र सुरु झालं आहे. त्याचवेळी मंगळवारी काकोली यांच्यासह तृणमुलचे सहा आमदार बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या प्रशासनिक समीक्षा बैठकीत सहभागी झाले होते. बंगालच्या राजकीय वर्तुळात याचे विविध अर्थ काढले जात आहेत. काकोली घोष यांनी अलीकडेच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भाजप सरकारच्या बैठकीला त्या उपस्थित राहिल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.

काकोली यांच्याशिवाय सुवेंदू अधिकारी यांच्या प्रशासनिक समीक्षा बैठकीला टीएमसी आमदार अनीसुर रहमान बिस्वास, स्वरूपनगर येथून बीना मंडल, हरोआचे आमदार मोहम्मद अब्दुल मतीन आणि बसीरहाट क्षेत्रातील तीन अन्य आमदार सहभागी झाले होते. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या बैठकीला उत्तर 24 परगणा, नदिया आणि हुगली जिल्ह्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राजकीय जाणकारांनुसार काकोली घोष यांची उपस्थिती केवळ प्रशासकीय नाही, तर राजकीय दृष्ट्‍या सुद्धा महत्वाची मानली जात आहे.

मी माझ्या भागाच्या विकासासाठी इथे आले

या बैठकीत सहभागी झालेल्या टीएमसी नेता बीना मंडल म्हणाल्या की, ‘मी माझ्या भागाच्या विकासासाठी इथे आले आहे’. “आमचे एकूण सहा आमदार या बैठकीत सहभागी झाले. राज्य सरकारने आम्हाला बोलावलं होतं. म्हणून एक आमदार म्हणून मी इथे आलोय” असं टीएमसी नेते मोहम्मद अब्दुल मतीन म्हणाले.

पश्चिम बंगालच्या राजकारणात एक नवी सुरुवात

“पश्चिम बंगालच्या जुन्या राजकीय संस्कृतीपेक्षा वेगळी ही एक नवी सुरुवात आहे. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो,तेव्हा आम्हाला प्रशासनिक बैठकीला बोलावलं जात नव्हतं. आम्ही ठरवलं सर्व आमदारांना बोलावलं जाईल” असं मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. बारासातच्या खासदाराने सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया दिली. बसीरहाटमधील अनेक विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा इथे आले आहेत. आम्ही त्यांच्यापैकी एकाला बोलण्याची संधी सुद्धा दिली.

Follow Us
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत