80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने देशातील 80 कोटी नागरिकांना दर महिन्याला प्रती व्यक्ती 27 किलो रुपयांचे गहू अवघ्या 2 रुपयांना आणि प्रती किलो 34 रुपये किंमतीचे असणारे तांदूळ फक्त 3 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे (Prakash javadekar on Cabinet decision).

80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 25, 2020 | 4:40 PM

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र, घरातून बाहेर न पडल्यास घरात पैसे कसे येणार आणि पोट कसं भरणार? असा प्रश्न उपस्थित होणाऱ्या गरिब, होतकरु कुटुंबांना सरकारने दिलासा दिला आहे (Prakash javadekar on Cabinet decision). केंद्र सरकारने देशातील 80 कोटी नागरिकांना दर महिन्याला प्रती व्यक्ती 27 किलो रुपयांचे गहू अवघ्या 2 रुपयांना आणि प्रती किलो 34 रुपये किंमतीचे असणारे तांदूळ फक्त 3 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे (Prakash javadekar on Cabinet decision).

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेतला. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. केंद्र सरकाने सर्व राज्य सरकारला तीन महिन्यांचा अॅडवान्स सामान खरेदी करण्याची सूचान दिली आहे, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीत कंत्राटी कामगारांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झाला. या कंत्राटी कामगारांनाही संपूर्ण वेतन मिळणार असल्याची घोषणा प्रकाश जावडेकर यांनी केली. यावेळी प्रकाश जावडेकर यांनी जनतेला काळजी घेण्याचंदेखील आवाहन केलं.

प्रकाश जावडेकर नेमकं काय म्हणाले?

“कोरोनामुळे देशावर मोठं संकट ओढवलं आहे. या आजारामुळे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात लॉकडाऊनची घोषणा करावी लागली. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी सरकारने देशातील जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा सरकारने दिली आहे. याशिवाय सर्व जीवनाश्यक सेवा सुरु असून किराणा, रेशनचे दुकान सुरु असणार आहेत”, अशी ग्वाही प्रकाश जावडेकर यांनी दिली.

“कोरोनापासून वाचायचं असेल तर 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा उपाय महत्त्वाचा आहे. हा लॉकडाऊन आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळेच सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सर्वांनी पुढचे 21 दिवस घरात राहा, दिवसात 15 ते 20 वेळा हात धुवावे, ताप, खोकला आणि सर्दी झालं तर तातडीने रुग्णालयात जावे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावं”, असं आवाहन जावडेकर यांनी केलं.

संबंधित बातम्या : Corona | भारतात फक्त 27 टक्के नागरिक घरात लॉकडाऊन, सर्व्हेत धक्कादायक माहिती

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.