AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धोक्याची घंटा वाजली नी पंतप्रधानांनी सूत्र फिरवली, प्रधान यांच्या राजीनाम्याची ती Inside Story, तुम्ही वाचली?

Dharmendra Pradhan Resign: शुक्रवारी सकाळपर्यंत केंद्र सरकार झुकणार नाही आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही असे मानले जात होते. सरकार आंदोलनातून तोडगा काढले असाही दावा काढण्यात येत होता. पण दुपारी चित्र पालटले. अगोदर NTA राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतील 47 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आणि नंतर प्रधानांचा राजीनामा आला.

धोक्याची घंटा वाजली नी पंतप्रधानांनी सूत्र फिरवली, प्रधान यांच्या राजीनाम्याची ती Inside Story, तुम्ही वाचली?
धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र मोदी, अभिजीत दिपके
| Updated on: Jul 26, 2026 | 9:42 AM
Share

Dharmendra Pradhan Resign: ज्याची शक्यताच नाकारली जात होती, तेच मोदी सरकारच्या इतिहासात पहिल्यांदा घडले. या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. ही तर सुरुवात आहे, अजून पिक्चर बाकी आहे, अशी लागलीच प्रतिक्रिया CJP चा संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी दिली. पण असे 24 तासात काय घडले की प्रधानांचा डाव संपला यावरून खल सुरू आहे. प्रधानांच्या राजीनाम्यापूर्वी सरकारने CJP सोबत बोलणीची फेरी सुरू केली. तात्काळ NTA राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतील 47 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. आंदोलकांच्या तीन मागण्या पूर्ण केल्या. पण प्रधानांचा राजीनाम्याशिवाय वातावरण निवळणार नाही याचा अंदाज सरकारला आला आणि पुढे जो घडले, त्याचा देश साक्षीदार झाला.

सरकारची कडक भूमिका

शुक्रवारी सकाळपर्यंत प्रधानांचा राजीनामा होणार नाही, अशी केंद्राची भूमिका होती. सरकार आंदोलन निवळण्यासाठी प्रयत्नात होते. अगोदर उच्च शिक्षण सचिवांना पदावरून हटवण्यात आले. नंतर NTA राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतील 47 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. पेपरफुटीतील दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षेचे, फास्ट ट्रॅक कोर्टातील खटल्याचे आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भरपाईचे आश्वासन देण्यात आले. पण कॉक्रोच जनता पार्टी प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम होती. त्यातच आंदोलनाचे लोण देशभरात पोहचले होते. मुंबई, पुणे, नागपूर, पाटणा ते इंफाळपर्यंत, दक्षिणेपर्यंत उत्तर भारतातही विद्यार्थी, तरुणाई रस्त्यावर उतरली. दुपारनंतर चित्र पालटले. राजीनाम्यासंदर्भात मंथन सुरू झाले. सरकार कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थिती नसल्याचे समोर आले.

परिस्थितीवर अमित शाह यांची नजर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देशातील आंदोलनं, तिथली हिंसा, पोलिसांसोबतच्या घटना, जाळपोळ, दगडफेक याचं इनपूट आलेले होते. पंतप्रधानांनी दोन दिवसांपासून मोर्चा सांभाळला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईशी संवाद साधला. त्यांना योग्य कारवाईचे आश्वासन दिले. पण दुपारपर्यंत सरकारच्या लक्षात आले की, प्रशासकीय निर्णयावर आता भागणार नाही. आता ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. आंदोलनाच्या आडून काही लोक फायदा उचलत असल्याचा आणि मोठं काहीतरी करणार असल्याचे इनपूट समोर येत होती.

मोदींनी सूत्र घेतली हाती

शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी सकाळपर्यंत घडामोडींना वेग आला. जंतरमंतरवर दगडफेक झाली. तर बिहारमध्ये हिंसाचार उफाळला. देशातील अनेक शहरात तरुणाई रस्त्यावर आली. सरकारविरोधातील वातावरण तापले. गोपनिय माहिती समोर येऊ लागली. प्रशासनाकडून इनपूट वाढले. पीएमओ ऑफिसपर्यंत या घडामोडी आल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची स्थिती लक्षात आणून देण्यात आली. हे इनपूट समोर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हाती घेतली. पुढे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून दिली.

Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना