AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“1990 मध्ये अडवाणींनी रथयात्रा काढली आणि समाजात फूट पडली, जिथे गेले तिथे द्वेषाची बीजे पेरली”- दिग्विजय सिंहांचा घणाघात

1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या, तेव्हा अटलबिहारी वाजपेयींच्या गांधीवादी समाजवादीला यश मिळू शकले नाही हे स्पष्ट झाले. यानंतर पक्षाने रामजन्मभूमी बाबरी मशीद हा राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा निर्णय घेतला, असा घणाघात त्यांनी केला.

1990 मध्ये अडवाणींनी रथयात्रा काढली आणि समाजात फूट पडली, जिथे गेले तिथे द्वेषाची बीजे पेरली- दिग्विजय सिंहांचा घणाघात
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 12:35 AM
Share

काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह म्हणाले की, लालकृष्ण अडवाणींनी 1990 मध्ये रथयात्रा काढली आणि समाजात फूट पाडली. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या सनराइज ओव्हर अयोध्या: द नेशनहूड इन अवर टाईम्स या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने दिग्विजय यांनी भाजपच्या विचारसरणीवरही कठोर भूमिका घेतली, हल्ला चढवला आणि भाजप देशात द्वेष निर्माण करणारा पक्ष असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की, 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या, तेव्हा अटलबिहारी वाजपेयींच्या गांधीवादी समाजवादीला यश मिळू शकले नाही हे स्पष्ट झाले. यानंतर पक्षाने रामजन्मभूमी बाबरी मशीद हा राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा निर्णय घेतला, असा घणाघात त्यांनी केला. (Congress Digvijay Singh slams BJP LK Advani for spreading commununal hate in India after Babri masjid demolition)

दिग्विजय सिंह यांनी देशातील द्वेषाच्या वातावरणासाठी अडवाणींना जबाबदार धरले. ते म्हणाले की, 1984 नंतर भाजपने कट्टर हिंदुत्वाचा मार्ग अवलंबला जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा आधार आहे. अडवाणींच्या रथयात्रेने देशभरातील समाजात फूट पाडली. अडवाणी जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली.

सलमान खुर्शीदने त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हरामशी केली आहे. रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही त्यांनी कठोर भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदु राष्ट्राच्या विचारसरणीच्या विरोधात असल्याचे त्यांनी लिहिले आहे.

Other News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल, मान आणि मणक्याच्या आजाराबाबत शस्त्रक्रियेची शक्यता

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार! मोदी सरकारने इथेनॉलच्या किमती प्रति लिटर 2.55 रुपयांनी वाढवल्या

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.