AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जिहाद’ फक्त कुराणात नाही तर गीतेतही; ‘या’ नेत्यांनी केलं वादग्रस्त विधान…

जिहाद हा केवळ कुराणात नाही तर तो गीतेतही सांगितला असल्याचा शिवराज पाटील सांगितले.

'जिहाद' फक्त कुराणात नाही तर गीतेतही; 'या' नेत्यांनी केलं वादग्रस्त विधान...
| Updated on: Oct 20, 2022 | 10:23 PM
Share

नवी दिल्लीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील (Former Home Minister Shivraj Patil) यांनी नुकताच एक वादग्रस्त विधान केले आहे. दिल्लीत एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, जिहाद (Jihad) केवळ कुराणात नाही तर गीतेतही (Geeta) सांगितला आहे. त्यापुढे जाऊन ते म्हणाले की, महाभारतातही श्रीकृष्णानी अर्जुनाला जिहादचा धडा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना शिवराज पाटील म्हणाले की, जिहाद हा केवळ कुराणात नाही तर तो गीतेतही सांगितला आहे.

कितीही प्रयत्न करूनही जर कोणाला स्वच्छ विचार कळत नसतील तर सत्तेचा वापर केला पाहिजे असं असल्याचंही त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते म्हणाले, गीतेचा जो काही विशिष्ट भाग महाभारतात सांगण्यात आला आहे, त्यामध्येच जिहाद आहे. महाभारतात श्रीकृष्णांनी अर्जुनालाही जिहादचा धडा शिकवला होता असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवराज पाटील यांची गणना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जाते. ते महाराष्ट्रातील असून शिवराज पाटील हे लातूरचे खासदार आहेत.

मात्र गेल्या 2014 पासून ही जागा भाजपच्या ताब्यात गेल्याने त्या याठिकाणी आता भाजपकडून बऱ्याच निवडणुका जिंकण्यात आल्या आहेत.

शिवराज पाटील 1980 पासून अनेकदा केंद्रात मंत्री राहिले आहेत. 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते देशाचे गृहमंत्री होते.

2010 मध्ये, शिवराज पाटील यांची पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.