AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress : पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर, सोनिया गांधींचे 5 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर असल्याचं दिसून येतं आहे. पाच राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे घेण्याचा निर्णय झाला आहे.

Congress : पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर, सोनिया गांधींचे 5 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश
Image Credit source: TV9
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Mar 15, 2022 | 9:10 PM
Share

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Election) नुकत्याच पार पडल्या. या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला (Congress) दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसनं यावेळी पंजाब सारखं राज्य हातातून गमावलं आहे. तर, गोवा आणि उत्तराखंडमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण असताना देखील पक्षाला यश आलेलं नाही. तर, उत्तर प्रदेशमध्ये पक्षाचे केवळ 2 आमदार निवडून आले आहेत. तर, मणिपूरमध्येही काँग्रेसला सत्ता मिळवता आलेली नाही. या पाच राज्यातील पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस वर्किंग कमिटीची नवी दिल्लीत बैठक पार पडली या बैठकींनंतर काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यांना राजीनामा द्यायला सांगितला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात ट्विट द्वारे माहिती दिली आहे. आता काँग्रेस पाच राज्यांच्या पराभवासंदर्भात आणखी कोणती पावलं उचलणार हे पाहावं लागणार आहे.

काँग्रेस ॲक्शन मोडवर

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर असल्याचं दिसून येतं आहे. पाच राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे घेण्याचा निर्णय झाला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संदर्भात सूचना केल्याची माहिती रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील प्रदेशाध्यक्ष राजीनामे देणार आहेत. यामध्ये पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू देखील राजीनामा देण्याची शक्यता आहे.

गोवा प्रदेशाध्यक्षांचा दुपारीच राजीनामा

गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. गोव्यात काँग्रेसला 11 जागा मिळवता आल्या. काँग्रेसचे गेल्या विधानसभा निवडणुकीत 17 आमदार निवडून आले होते. मात्र, नंतरच्या काळात 15 आमदारांनी पक्ष सोडला. काँग्रेसला या निवडणुकीत 11 आमदार निवडून आणण्यात यशं आलंय. मात्र, सत्ता मिळवण्यात अपयश आलंय. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज दुपारीच राजीनामा दिला आहे.

काँग्रेस पक्षातील कलह कधी संपणार?

काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी जी-23 मधील नेत्यांना घरी बोलावलं आहे. जी23 नेत्यांना उद्या रात्री जेवणाच निमंत्रण दिलं आहे. कपिल सिब्बल यांच्या घरी कोणकोण नेते जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या:

Cidco : सिडकोची नवी मुंबईकरांना होळी भेट, 6508 घरं विक्रीसाठी उपलब्ध करणार

 IPL 2022: खबरदार! बायो बबल मोडल्यास बंदीपासून ते कोट्यवधीचा दंड, वाचा BCCI चे अद्दल घडवणारे नियम

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली