AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार ऐनवेळी संकटात सापडणार, काँग्रेसच्या 2 मंत्र्यांकडून थेट इशारा; काय घडतंय?

2026 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. TVKने 108 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले. तर DMKला 59 आणि काँग्रेसला 5 जागा मिळाल्या.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार ऐनवेळी संकटात सापडणार, काँग्रेसच्या 2 मंत्र्यांकडून थेट इशारा; काय घडतंय?
thalapathy vijay and rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 31, 2026 | 10:11 PM
Share

Thalapathy Vijay : अभिनेते विजय थलापती तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून हे राज्य देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर विजय यांनी 2029 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त खासदारंचा विजय व्हावा यासाठी विजय आतापासूनच आपली रणनीती आखत आहेत. तामिळनाडूमध्ये विजय थलापती हे देशाचे आगामी पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान थलापती यांचे नाव पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जात असतानाच आता काँग्रेसच्या भूमिकेमुळे तामिळनाडूच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

काँग्रेसने नेमकी काय भूमिका घेतली?

काँग्रेसचे तामिळनाडूतील मंत्री एस. राजेश कुमार यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळघम (TVK)ला थेट इशारा दिला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून TVKने पाठिंबा दिला नाही, तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे कुमार यांनी म्हटले आहे. कन्याकुमारी येथे रविवारी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राजेश कुमार यांनी ही भूमिका मांडली. ते किल्लीयूर मतदारसंघाचे आमदार असून तामिळनाडूचे पर्यटन मंत्री आहेत. मी स्वत: आणि माझे मंत्रिमंडळातील सहकारी पी. विश्वनाथन हे दोघेही आपल्या पदांचा राजीनामा देण्यास तयार आहेत, असे ते म्हणाले. त्यांचे हे विधान म्हणजे TVKने राहुल गांधी यांच्या उमेदवारीला पाठिंबा न दिल्यास काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता असल्याचेच द्योतक असल्याचे मानले जात आहे.

दोन्ही मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडू

दरम्यान, TVKमधील काही आमदार आणि मंत्री विजय यांना 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा संभाव्य चेहरा म्हणून पुढे करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे टीव्हीकेचा हा प्रयत्न सुरू असतानाच 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील. TVKने त्यांना पाठिंबा नाकारल्यास आम्ही दोन्ही मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडू. आमच्यासाठी पक्ष सर्वाधिक महत्त्वाचा आहे,” असे राजेश कुमार यांनी सांगितले आहे.

तामिळनाडूनत सध्या काँग्रेस सत्तेत

2026 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. TVKने 108 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले. तर DMKला 59 आणि काँग्रेसला 5 जागा मिळाल्या. त्यानंतर काँग्रेसने DMKसोबतची आघाडी सोडून TVKसोबत हातमिळवणी केली. ही युती करताना काँग्रेसने राजकारणात आघाड्या होणे आणि तुटणे स्वाभाविक असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...