AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आता 12 वर्षांवरील मुलांना मिळणार कोरोनाची लस, वृद्धांनाही मिळणार बुस्टर डोस; सरकारचा मोठा निर्णय

लहान मुलं सुरक्षित तर देश सुरक्षित राहणार. त्यांनी त्यापुढे लिहिले आहे की, 16 मार्च पासून कोविड लसिकरणाला पुन्हा प्रारंभ करत आहोत, आणि त्यामध्ये 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना आम्ही बूस्टर डोस देणार आहोत.

...आता 12 वर्षांवरील मुलांना मिळणार कोरोनाची लस, वृद्धांनाही मिळणार बुस्टर डोस; सरकारचा मोठा निर्णय
प्रातिनिधिक छायाचित्र.Image Credit source: TV9
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 14, 2022 | 3:58 PM
Share

मुंबईः कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) वाचण्यासाठी आता एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 16 मार्च पासून 12 ते 14 वयोगटातील बालकांना व्हॅक्सिन (Vaccine) देण्यात येणार आहे. 12 ते 14 वयोगटातील बालकांना आता Corbevax व्हॅक्सिन दिले जाणार आहे. Corbevax हे Biological E Limited या कंपनीने तयार केले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी आता अनेक उपाय करण्यात येत असले तरी आता एक चांगली गोष्ट समोर आली आहे.16 मार्च पासून 12 ते 14 वयोगटातील बालकांना व्हॅक्सिन देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister) यांनी दिली आहे.

बालकांसाठी हा निर्णय घेतल्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना आता बूस्टर डोस देण्यात आला आहे. या आधी भारतात फक्त आरोग्य विभागाचे कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स आणि ज्या नागरिकांच वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे आणि ज्यांना comorbidity आहे, त्यांनाच फक्त बूस्टर डोस देण्यात येत होता.

मुलं सुरक्षित तर देश सुरक्षित

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करुन सांगितले आहे की,लहान मुलं सुरक्षित तर देश सुरक्षित राहणार. त्यांनी त्यापुढे लिहिले आहे की, 16 मार्च पासून कोविड लसिकरणाला पुन्हा प्रारंभ करत आहोत, आणि त्यामध्ये 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना आम्ही बूस्टर डोस देणार आहोत. त्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही लस घेण्याचे आवाहन केले आहे.

लहान मुलांसाठी व्हॅक्सिनला सुरुवात

भारतात 3 जानेवारीपासून लहान मुलांसाठी व्हॅक्सिनला सुरुवात करण्यात आली होती, पहिल्या टप्प्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी व्हॅक्सिन देण्यात येत आहे. तर आता 12 ते 14 वयोगटातील बालकांना व्हॅक्सिन सुरु करण्यात आले आहे.

नागरिकांना व्हॅक्सिन डोस

भारतात सध्या कोरोनाची परिस्थिती भयावह नसली तरी मागील 24 तासात 2503 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 4377 नागरिक चांगले झाले आहेत. तर 27 नागरिकांचा या काळात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या ही 36, 168 इतकी झाली असून 675 दिवसांतील ही रुग्णसंख्या सर्वात कमी आहे. तर गेल्या 680 दिवसातील कोरोनाच्या केसही कमी झाल्या आहेत. देशातील 1 कोटी 80 नागरिकांना व्हॅक्सिन डोस देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

मराठी माणसांची मनसे पुन्हा दिसली पाहिजे, राज ठाकरेंच्या सूचना; हिंदुत्वावरही जोर

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने नाकारला, अडचणी आणखी वाढणार?

साखर कारखाने विक्री, अनियमितता आणि अण्णा हजारेंची तक्रार, विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं, ते प्रकरण नेमकं काय?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली