AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Crime News : बिहारमध्ये आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्नाला नकार दिल्याने वडिलांकडून मुलीची हत्या

पीडित मुलीचे कुटुंब नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोतवा गावातील रहिवासी आहेत. मुलीच्या वडिलांना मसांथाना गावातील बिरछा येथील तरुणासोबत तिचे लग्न लावायचे होते. मात्र मुलीला आणि तिच्या आईला तो मुलगा पसंत नव्हता. तसेच मुलीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि तिला त्याच्यासोबत लग्न करायचे होते.

Bihar Crime News : बिहारमध्ये आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्नाला नकार दिल्याने वडिलांकडून मुलीची हत्या
महावितरणचा भोंगळ कारभार दोन भावंडांच्या जीवावर बेतलाImage Credit source: tv9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 07, 2022 | 11:39 PM
Share

गोपालगंज : आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न (Marriage) करण्यास नकार दिल्याने वडिलांनी आपल्या भावासह मिळून गळा दाबून मुलीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील गोपालगंज येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी मुलीचा मृतदेह घराजवळील शेतात टाकून दिला. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या जबाबानुसार मुलीचे वडिल आणि दोन काका यांच्याविरुद्ध नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (Daughter murdered by father in Bihar for refusing to marry his favorite boy)

वडिल आणि काकांनी मिळून मुलीचा गळा चिरला

पीडित मुलीचे कुटुंब नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोतवा गावातील रहिवासी आहेत. मुलीच्या वडिलांना मसांथाना गावातील बिरछा येथील तरुणासोबत तिचे लग्न लावायचे होते. मात्र मुलीला आणि तिच्या आईला तो मुलगा पसंत नव्हता. तसेच मुलीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि तिला त्याच्यासोबत लग्न करायचे होते. याच वादातून मुलीच्या वडिलांनी मुलीची हत्या केली. मुलीचे वडिल नेहमी दारु प्यायचे. रविवारी रात्रीही मुलीचे वडिल आणि तिचे दोन काका दारुच्या नशेत घरी आले आणि त्यांनी मुलीचा गळा चिरला. यावेळी मध्ये पडलेली मुलीची आईही जखमी झाली आहे.

आरोपी फरार असून पोलिस शोध घेताहेत

सोमवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. तीनही आरोपी घरातून फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. शहर निरीक्षक लालन कुमार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या संशोधनात सर्व काही स्पष्ट झाले असून गुन्हेगारही लवकरच पकडले जातील. तसेच आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरु असल्याचे एसडीपीओ संजीव कुमार यांनी सांगितले.

बुलडाण्यात झाडाला लटकलेला मृतदेह आढळला

बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव-खामगाव रोडवरील कनारखेड फाट्यावर 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थतेत आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही घटना आत्महत्या आहे की हत्या ?, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. याप्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार मयत गणेश वाकोडे याने शर्टाच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिस पुढील तपास करत आहेत. तर मृतक गणेश वाकोडे याने खरंच आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याचाही तपास पोलीस करत आहेत. (Daughter murdered by father in Bihar for refusing to marry his favorite boy)

इतर बातम्या

BSF Jawan Firing : पंजाबपाठोपाठ बंगालमध्येही बीएसएफ जवानाचा गोळीबार; सहकार्‍यावर गोळ्या झाडून स्वतःलाही संपवले

Amaravati Crime : हरवलेले आणि चोरी गेलेले 22 लाख किंमतीचे 150 मोबाईल अमरावती शहर पोलिसांनी केले परत

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली