Amaravati Crime : हरवलेले आणि चोरी गेलेले 22 लाख किंमतीचे 150 मोबाईल अमरावती शहर पोलिसांनी केले परत

अमरावतीमध्ये मागील पाच महिन्यात अनेकांचे मोबाईल हरवले व चोरी गेल्याच्या तक्रारी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्याच आधारे सायबर क्राईम विभागाने या हरवलेल्या व चोरी गेलेल्या जवळपास दीडशे मोबाईलचा शोध लावला आहे.

Amaravati Crime : हरवलेले आणि चोरी गेलेले 22 लाख किंमतीचे 150 मोबाईल अमरावती शहर पोलिसांनी केले परत
डोंबिवलीमध्ये एटीएम फोडणारा उच्चशिक्षित चोरटा गजाआडImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 7:57 PM

अमरावती : अनेकदा आपला मोबाईल (Mobile) हरवला किंवा चोरीला गेला तर तो पुन्हा परत मिळेल याची फार शाश्वती नसते. पण अनेकजण पोलिसांवर विश्वास ठेवून मोबाईल हरवल्याची तक्रार ही पोलिसांत करत असते. त्यातून मग पोलीस शोध घेत असतात आणि ते मोबाईल जप्त केल्यानंतर मूळ मालकांना परत देत असतात. अशातच आता अमरावती शहरातूनही चोरी गेलेले आणि हरवलेले जवळपास 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 150 मोबाईल अमरावती शहर पोलिसां (Amaravati City Police)च्या सायबर विभागाने शोधून व त्याचा तपास करून जमा केले होते. दरम्यान आज हे मोबाईल अमरावती शहराच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्या हस्ते महिला दिनाच्या कार्यक्रमात मूळ मोबाईल धारक महिलांना ते परत करण्यात आले आहेत. यावेळी मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल धारकांनी अमरावती शहर पोलिसांचे व सायबर क्राइम विभागाचे आभार मानले आहेत. (Amravati city police have recovered 150 lost and stolen mobiles worth Rs 22 lakh)

सायबर क्राईम विभागाने 150 मोबाईलचा शोध लावला

अमरावतीमध्ये मागील पाच महिन्यात अनेकांचे मोबाईल हरवले व चोरी गेल्याच्या तक्रारी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्याच आधारे सायबर क्राईम विभागाने या हरवलेल्या व चोरी गेलेल्या जवळपास दीडशे मोबाईलचा शोध लावला आहे. या संदर्भात अधिक तपास करून हे मोबाईल पुन्हा तक्रार करणाऱ्या महिलांना पोलीसांनी परत केले आहे, अशी माहिती सायबर क्राइमच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी दिली.

आतापर्यंत शेकडो जणांचे मोबाईल परत

अमरावती शहरात मोबाईल चोरीच्या घटना या शहरामध्ये घडत असतात. त्यानंतर मोबाईल धारक आपली तक्रार सायबर विभागाकडे करतात. पोलिसांनी आतापर्यंत शेकडो जणांचे मोबाईल परत केले आहेत. अशातच जवळपास तीस लाख रुपये किंमतीचे मोबाईल आम्ही परत केल्याची माहिती अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांनी दिली.

फिंगर प्रिंटच्या आधारे नागपूरच्या चोरट्याला अकोल्यातून अटक

फिंगर प्रिंटचा आधार घेत नागपूर पोलिसांनी अकोल्यातून एका कुख्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याने 10 घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक करत बराच मुद्देमाल हस्तगत केला. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात घरफोड्या वाढल्या होत्या. मात्र आरोपी हाताला लागत नव्हते. पोलिस आणि गुन्हे शाखा यावर तपास करत होते. तपासा दरम्यान अनेक ठिकाणचे फिंगर प्रिंट घेण्यात आले होते. त्यापैकी एका ठिकाणचे फिंगर प्रिंट अकोल्यात असलेल्या अक्षय दारोकर याच्या फिंगर प्रिंटशी मॅच झाले आणि पोलिसांनी त्याला अकोला येथून अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याने 10 घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्या सोबत पोलिसांनी दोन साथीदारांनाही अटक केली असून काही प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. (Amravati city police have recovered 150 lost and stolen mobiles worth Rs 22 lakh)

इतर बातम्या

Supreme Court : बनावट प्रमाणपत्रे बनवून कोरोना मृत्यूची भरपाई लाटली जातेय; सुप्रीम कोर्टाने दिला कारवाईचा इशारा

…अन्यथा 16 मार्चनंतर ओला, उबर चालवता येणार नाही? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.