AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amaravati Crime : हरवलेले आणि चोरी गेलेले 22 लाख किंमतीचे 150 मोबाईल अमरावती शहर पोलिसांनी केले परत

अमरावतीमध्ये मागील पाच महिन्यात अनेकांचे मोबाईल हरवले व चोरी गेल्याच्या तक्रारी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्याच आधारे सायबर क्राईम विभागाने या हरवलेल्या व चोरी गेलेल्या जवळपास दीडशे मोबाईलचा शोध लावला आहे.

Amaravati Crime : हरवलेले आणि चोरी गेलेले 22 लाख किंमतीचे 150 मोबाईल अमरावती शहर पोलिसांनी केले परत
डोंबिवलीमध्ये एटीएम फोडणारा उच्चशिक्षित चोरटा गजाआडImage Credit source: TV 9
| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 7:57 PM
Share

अमरावती : अनेकदा आपला मोबाईल (Mobile) हरवला किंवा चोरीला गेला तर तो पुन्हा परत मिळेल याची फार शाश्वती नसते. पण अनेकजण पोलिसांवर विश्वास ठेवून मोबाईल हरवल्याची तक्रार ही पोलिसांत करत असते. त्यातून मग पोलीस शोध घेत असतात आणि ते मोबाईल जप्त केल्यानंतर मूळ मालकांना परत देत असतात. अशातच आता अमरावती शहरातूनही चोरी गेलेले आणि हरवलेले जवळपास 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 150 मोबाईल अमरावती शहर पोलिसां (Amaravati City Police)च्या सायबर विभागाने शोधून व त्याचा तपास करून जमा केले होते. दरम्यान आज हे मोबाईल अमरावती शहराच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्या हस्ते महिला दिनाच्या कार्यक्रमात मूळ मोबाईल धारक महिलांना ते परत करण्यात आले आहेत. यावेळी मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल धारकांनी अमरावती शहर पोलिसांचे व सायबर क्राइम विभागाचे आभार मानले आहेत. (Amravati city police have recovered 150 lost and stolen mobiles worth Rs 22 lakh)

सायबर क्राईम विभागाने 150 मोबाईलचा शोध लावला

अमरावतीमध्ये मागील पाच महिन्यात अनेकांचे मोबाईल हरवले व चोरी गेल्याच्या तक्रारी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्याच आधारे सायबर क्राईम विभागाने या हरवलेल्या व चोरी गेलेल्या जवळपास दीडशे मोबाईलचा शोध लावला आहे. या संदर्भात अधिक तपास करून हे मोबाईल पुन्हा तक्रार करणाऱ्या महिलांना पोलीसांनी परत केले आहे, अशी माहिती सायबर क्राइमच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी दिली.

आतापर्यंत शेकडो जणांचे मोबाईल परत

अमरावती शहरात मोबाईल चोरीच्या घटना या शहरामध्ये घडत असतात. त्यानंतर मोबाईल धारक आपली तक्रार सायबर विभागाकडे करतात. पोलिसांनी आतापर्यंत शेकडो जणांचे मोबाईल परत केले आहेत. अशातच जवळपास तीस लाख रुपये किंमतीचे मोबाईल आम्ही परत केल्याची माहिती अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांनी दिली.

फिंगर प्रिंटच्या आधारे नागपूरच्या चोरट्याला अकोल्यातून अटक

फिंगर प्रिंटचा आधार घेत नागपूर पोलिसांनी अकोल्यातून एका कुख्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याने 10 घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक करत बराच मुद्देमाल हस्तगत केला. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात घरफोड्या वाढल्या होत्या. मात्र आरोपी हाताला लागत नव्हते. पोलिस आणि गुन्हे शाखा यावर तपास करत होते. तपासा दरम्यान अनेक ठिकाणचे फिंगर प्रिंट घेण्यात आले होते. त्यापैकी एका ठिकाणचे फिंगर प्रिंट अकोल्यात असलेल्या अक्षय दारोकर याच्या फिंगर प्रिंटशी मॅच झाले आणि पोलिसांनी त्याला अकोला येथून अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याने 10 घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्या सोबत पोलिसांनी दोन साथीदारांनाही अटक केली असून काही प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. (Amravati city police have recovered 150 lost and stolen mobiles worth Rs 22 lakh)

इतर बातम्या

Supreme Court : बनावट प्रमाणपत्रे बनवून कोरोना मृत्यूची भरपाई लाटली जातेय; सुप्रीम कोर्टाने दिला कारवाईचा इशारा

…अन्यथा 16 मार्चनंतर ओला, उबर चालवता येणार नाही? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....