AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडे यांना ठाकरे गटाचं आवतन, दीपक केसरकर यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, पंकजा यांना ते राज्यसभेवर…

पंकजा मुंडे ठाकरे गटामध्ये येऊन नेमकं काय करणार? पंकजा यांना ते राज्यसभेवर तर पाठवू शकत नाहीत. तेवढी संख्या त्यांच्याकडे नाही, असा चिमटा दीपक केसरकर यांनी काढला आहे.

पंकजा मुंडे यांना ठाकरे गटाचं आवतन, दीपक केसरकर यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, पंकजा यांना ते राज्यसभेवर...
deepak kesarkarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 14, 2023 | 11:50 AM
Share

नवी दिल्ली: भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये अस्वस्थ असल्याच्या जोरदार चर्चा आहे. त्यामुळे त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पंकजा मुंडे यांनी आमच्यासोबत यावं, असं आवतनच ठाकरे गटाने पंकजा मुंडे यांना दिलं आहे. ठाकरे गटाच्या या आवतनाची शिंदे गटाचे नेते, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खिल्ली उडवली आहे. पंकजा मुंडे ठाकरे गटात येऊन काय करणार? असा खोचक सवालच दीपक केसरकर यांनी विचारला आहे.

पंकजा मुंडे ठाकरे गटामध्ये येऊन नेमकं काय करणार? पंकजा यांना ते राज्यसभेवर तर पाठवू शकत नाहीत. तेवढी संख्या त्यांच्याकडे नाही, असा चिमटा दीपक केसरकर यांनी काढला आहे. आधीच त्यांची बोलणी प्रकाश आंबेडकरांशी सुरू आहे. तिथेही राष्ट्रवादीवर विश्वास नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे, असंही ते म्हणाले.

त्यापेक्षा ते बाळासाहेबांच्या विचारांवर ठाम राहिले असते तर ही परिस्थिती आली नसती, असा चिमटा त्यांनी काढला आहे. तसेच संजय राऊत म्हणतात समन्वय हवा. त्यांना राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अजित दादांना घाई झाली असावी. आताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना आघाडीवर होती. हे सर्वांनाच माहीत आहे, असं ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर आज 4 वाजता राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे दीपक केसरकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठ्यांची शौर्यगाथा ही महत्त्वपूर्ण आहे. पानिपतमध्ये नक्कीच एक स्मारक व्हायला हवे. आम्ही राज्य सरकार म्हणून नक्की त्यासाठी प्रयत्न करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...