AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील ‘या’ राज्यात मोठी घोषणा, दर महिन्याला महिलांना मिळणार 1000 रुपये

आगामी लोकसभा निवडणुकीत महिलांची मत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्ष आखणी करत आहेत. केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारने सुद्धा महिलांना प्राधान्य देण्याच धोरण आखलं आहे. देशाच्या एका राज्यातील सरकारने मोठी घोषणा केली आहे.

देशातील 'या' राज्यात मोठी घोषणा, दर महिन्याला महिलांना मिळणार 1000 रुपये
Women Entrepreneur
| Updated on: Mar 04, 2024 | 12:59 PM
Share

नवी दिल्ली : सध्या देशातील सगळीच सरकार महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना बनवत आहे. अनेक राज्यांची सरकार केंद्राच अनुकरण करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत महिलांची मत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे महिला वर्गाला आकर्षित करण्याचा प्रत्येक राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. आता दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने सोमवारी राजधानी दिल्लीसाठी 76 हजार कोटी रुपयांच बजेट सादर केलं. दिल्लीच्या केजरीवाल सरकारने मागच्यावेळी 78 हजार कोटी रुपयांच बजेट सादर केलं होतं. यावेळी हे बजेट 2 हजार कोटी रुपयांनी कमी केलं. बजेटची घोषणा करताना मंत्री आतिशी यांनी सांगितलं की, या वर्षी शिक्षणासाठी बजेटमध्ये 16393 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण बजेटच्या ही 21 टक्के रक्कम आहे.

2013 साली आम्ही राजकारणात आलो. त्यावेळी आम्ही लोकांना मतदान करण्यासाठी जातान पहायचो. लोक म्हणायचे की, मतदान केल्याने काय फरक पडतो?. नेते येत-जात असतात, पण त्याने आयुष्यावर काय फरक पडतो. दिल्लीत राम राज्य साकारण्याचा आमचा संकल्प आहे. केजरीवाल सरकारच दहाव बजेट सादर करताना, मी हे दाव्यानिशी सांगू शकते की, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन झालय. दिल्लीमध्ये प्रत्येक महिलेला 1 हजार रुपये देण्याची अरविंद केजरीवाल सरकारने मोठी घोषणा केली आहे. 18 वर्षावरील प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1 हजार रुपये देण्यात येतील. मुख्यमंत्री महिला सम्मान योजनेतंर्गत ही रक्कम दिली जाईल.

लोकांनी त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला

राम राज्याच स्वप्न साकार करण्यासाठी मागच्या 9 वर्षांपासून आम्ही दिवस-रात्र मेहनत घेतोय. राम राज्यासाठी आम्हाला अजून बरीच मेहनत घ्यायची आहे. आधी लोकांना रुग्णालयात महागडी बिल भरावी लागायची. दागिने गहाण ठेवावे लागायचे. शिकून मुलांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. अशावेळी अरविंद केजरीवाल आशेचा किरण बनून आले. लोकांनी त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला. मोठ्या बहुमताचा आशिर्वाद दिला.

मंत्री आतिशी म्हणाल्या की, “2014 मध्ये GSDP 4.95 लाख कोटी रुपये होता. आता त्यात चारपट वाढ झालीय. महसूलात सतत वाढ होतेय. 2014-15 मध्ये दिल्लीच बजेट 30950 कोटी रुपये होतं. 2024-25 मध्ये 76 हजार कोटी रुपयांच बजेट मी सादर करतेय”

चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.