AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये दारुबंदी, पण 55 हजार महिला आणि 10 लाख लोक दारुच्या आहारी, तर 11 लाख लोकांना लागते भांग!

सामाजिक न्याय विभागामार्फत जारी एका राष्ट्रीय सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार 10 लाख लोक दारुच्या आहारी गेल्याचं सांगण्यात आलं आहे. फक्त पुरुषच नाही तर 55 हजार महिलांचाही यात समावेश असल्याचं या अहवालात म्हटलंय.

बिहारमध्ये दारुबंदी, पण 55 हजार महिला आणि 10 लाख लोक दारुच्या आहारी, तर 11 लाख लोकांना लागते भांग!
| Updated on: Mar 21, 2021 | 6:01 PM
Share

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एप्रिल 2020 मध्ये राज्यात कडक निर्बंध लागू करत दारुबंदीची घोषणा केलीय. त्यामुळे बिहारमध्ये तसं पाहिलं गेलं तर दारु विक्री आणि दारु पिण्यावर बंदी आहे. पण राष्ट्रीय स्तरावरील एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आलीय. सामाजिक न्याय विभागामार्फत जारी एका राष्ट्रीय सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार 10 लाख लोक दारुच्या आहारी गेल्याचं सांगण्यात आलं आहे. फक्त पुरुषच नाही तर 55 हजार महिलांचाही यात समावेश असल्याचं या अहवालात म्हटलंय.(Despite the ban in Bihar, 10 lakh people are addicted to alcohol)

मिळालेल्या माहितीनुसार हा अहवाल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्लीच्या नॅशनल डिपेंडन्स ट्रिटमेंटने तयार केला आहे. बिहारमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून हा अहवाल तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. बिहारमध्ये सध्या 10 लाखपेक्षा जास्त लोक दारुच्या आहारी गेले आहेत. तर 11 लाख लोक नशा करण्यासाठी भांगेचा वापर करतात. तर बिहारमध्ये 1.3 लाख लोक इनहेलेंट्सच्या आहारी गेले आहेत.

बिहारमध्ये ‘नशा मुक्त भारत अभियान’ सुरु होणार

बिहारचे समाजकल्याण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात नशा करता येणारी औषधं आणि पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा लोकांना नशेपासून दूर करण्यासाठी बिहार सरकार एक अभियान हाती घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बिहारला व्यसनमुक्त करण्यासाठी ‘नशा मुक्त भारत अभियान’ सुरु करण्यात आलं आहे. या अभियानासाठी राजदूत म्हणून सायकल गर्ल ज्योती कुमारी हिची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली आहे.

व्यसनामुळे गुन्ह्यांमध्येही वाढ

बिहारमध्ये दारु बंदी करण्यात आली असली तरी लोक अन्य मार्गाने व्यसन करत आहेत. वसनाच्या आहारी गेलेले काही लोक राज्यात चोरी आणि मानवी तस्करीसारखे गुन्हे करत असल्याची धक्कादायक माहितीही या अहवालातून समोर आली आहे.

इतर बातम्या :

Indian Railway : पहिला वातानुकूलित थ्री टियर इकॉनॉमी क्लास डबा प्रवाशांच्या सेवेत

मोदी सरकारचा WhatsApp च्या New Privacy Policy ला विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात ‘ही’ मागणी

Despite the ban in Bihar, 10 lakh people are addicted to alcohol

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.