AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाताना आता घ्यावी लागणार ही काळजी, मंदिर प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय

तिरुपती बालाजी मंदिरांच्या काही नियमांमुळे श्रद्धाळु नाराज झाले आहेत. गेल्या आठवड्यात येथे घडलेल्या एका बालीकेच्या मृत्यूनंतर मंदिर प्रशासन सावध झाले आहे.

तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाताना आता घ्यावी लागणार ही काळजी, मंदिर प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय
TIRUPATIImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 16, 2023 | 4:24 PM
Share

हैदराबाद | 16 ऑगस्ट 2023 : तिरुमाला तिरुपती बाजाजी मंदिराच्या दर्शनासाठी लाखो भाविक जात असतात. तिरुपतीच्या दर्शनाला पायी जाताना भाविकांना आपल्या सोबत एक वस्तू सोबत ठेवावी लागणार आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी आता नवीन निर्णय घेतला आहे. त्यानूसार आता भाविकांना स्वत:ची काळजी घेण्यासाठी त्यांच्या सोबत एक लाकडी छडी ठेवावी लागणार आहे. तिरुपती मंदिर प्रशासनाच्यावतीने श्रद्धाळूंना हाजीमलंगला जाताना जसा सोबत काठी दिली जाते तशी लाकडी काठी दिली जाणार आहे.

तिरुपती बालाजीचे देवस्थान जगभरात प्रसिध्द असून जगभरातून येथे भाविक नवस करायला दरवर्षी येत असतात. परंतू गेल्या आठवड्यात येथील मंदिराचा पायवाट चढणाऱ्या एका सहा वर्षीय मुलीवर बिबट्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे यापुढे अशा घटनापासून वाचण्यासाठी पावले उचलली आहेत. पायी वाटेने जाताना आता शंभर भाविकांच्या मागे एक सुरक्षा गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाविकांना लाकडी छडी देण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

जंगली जनावरांना आकर्षित होतील अशा खाण्यापिण्याच्या वस्तू कुठेही टाकू नये. तसेच खाद्यपदार्थांच्या दुकानदारांनाही कुठेही कचरा टाकू नये असे आदेश देण्यात आले आहेत. भाविकांनी माकडांना जेवण देऊ नये. पाऊल वाटेवर कुंपण लावण्याचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाला मंजूरीसाठी पाठविला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दुपारनंतर लहान मुलांना मनाई 

तिरुपती बालाजी मंदिरांच्या काही नियमांमुळे श्रद्धाळु नाराज झाले आहेत. आपल्या सहा वर्षांच्या मुलासह आलेल्या स्वाती किरण यांनी सांगितले की आम्ही दूरवरुन येथे येतो. जर दुपारी दोन नंतर लहान मुलांना प्रवेश दिला नाही तर आम्हाला पूर्ण रात्र वाट पहावी लागेल. आणि सकाळी पाच वाजता दर्शन मिळेल. हैदराबादचे एक श्रद्धाळू बालकृष्ण गौड यांनी म्हटले की भाविकांना रोखण्याऐवजी मंदिर प्रशासनाने सुरक्षा वाढवावी आणि मंदिर मार्गावर कुंपण बांधायला हवे असेही त्यांनी म्हटले आहे.

सहा वर्षांच्या बालिकेवर हल्ला

आपल्या पालकांसह दर्शनाला आलेली सहा वर्षीय लक्षिता वाट चुकल्याने बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. लक्षितावर हल्ला केल्याचा संशय असलेला बिबटा नंतर 48 तासांनी जेरबंद झाला. आता मार्गांवर तीस मीटरपर्यंत प्रकाश पसरणारे दिवे लावले जाणार आहेत. सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यात येणार आहेत. तसेच वन्यपूश ट्रॅकर, ड्रोन कॅमेरे, चोवीस तास डॉक्टरांची नेमणूक केली जाणार आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.