भारताला ज्याची भीती तेच घडले, एल निनोचा भयंकर अंदाज, थेट इशारा, प्रचंड..
भारताच्या दिशेने एक मोठे संकट येत आहे. ज्याने थेट भारतात मोठा परिणाम दिसेल. एल निनोबाबत झोप उडवणारी माहिती पुढे येत आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय प्रशासनाने गंभीर इशारा दिला. याचा थेटपणे परिणाम भारतात बघायला मिळेल.

भारताच्या दिशेने मोठे संकट येत आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय प्रशासनाच्या (NOAA) हवामानशास्त्रज्ञांनी एल निनोमुळे यावर्षी अटलांटिक चक्रीवादळांचा हंगाम सामान्यपेक्षा शांत राहील असा अंदाज वर्तवला आहे. या एल निनोचा थेट परिणाम भारतावर होणार आहे. त्यामध्येच भारताच्या दिशेने हे पुढे सरकत आहे. एल निनोमुळे चक्रीवादळ सामान्यपेक्षा कमी होण्याची 55 टक्के आणि सामान्यपेक्षा जास्त होण्याची 10 टक्के शक्यता आहे. हा अत्यंत मोठा धोका आहे. या एल निनोमुळे कहर होऊ शकतो. याबाबत अगोदरच मोठा इशारा देण्यात आला. प्रशासन देखील सतर्क मोडवर आहे. अटलांटिक चक्रीवादळ जूनच्या सुरुवातीपासून 30 नोव्हेंबरपर्यंत असतो. हा त्याचा कालावधी आहे. हे वादळ जूनपेक्षा सप्टेंबर महिन्यात अधिक तीव्र होते आणि सर्व खेळखंडोबा करते.
एल निनो म्हणजे मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात होणारी एक नियतकालिक वाढ आहे. यामुळे थेट पर्जन्यवृष्टीच्या प्रणालींमध्ये व्यत्यय येतो. याचा परिणाम पुढे असा होतो की, जगाच्या अनेक भागात पूर, दुष्काळ आणि उष्णतेची लाट येऊ शकते. यावेळी या एल निनोचा प्रभाव भारतात बघायला मिळेल. याचा मोठा फटका बसू शकतो.
बऱ्याचदा एल निनो दरम्यान तापमानात मोठी वाढ होते. चक्रीवादळ किंवा उष्णता दोन्ही एल निनोमध्ये अत्यंत उद्धवस्थ करून टाकते. जर उष्णता वाढली तर दुष्काळ पडू शकतो. जर चक्रीवादळ आले तर एक थैमान घालून जाते. यंदा भारतावर थेट परिणाम एल निनोचा असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. एल निनो साधारणपणे दर 2 ते 7 वर्षांनी घडते. दरवर्षीच एल निनो होते, असे अजिबातच नाही.
धक्कादायक म्हणजे एल निनो तब्बल 9 महिने ते 12 महिने टिकते. ला निनो म्हणजे पॅसिफिक महासागरातील सामान्यपेक्षा थंड तापमान. एल निनो दरम्यान वारे कमकुवत होते किंवा त्यांची दिशा बदलते. एल निनोचा भारतावर थेट परिणाम होईल. यामुळे उन्हाळा अधिक काळ टीकेल. किंवा पावसाळ्यात सामान्यापेक्षा खूप जास्त पाऊस होईल. याचा थेट भारताच्या शेतीवर परिणाम होईल. अति पाऊल झाला किंवा अती उन्हाळा पडला तरीही त्याचा परिणाम शेतीवर होईल. यामुळे अन्नधान्याच्या किमतीही वाढू शकतात.