AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन

Shri Prakash Jaiswal Death News : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन झाले आहे. ते कानपूरमधून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. तसेच त्यांनी 10 वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन
Shri prakash jaiswalImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 28, 2025 | 10:03 PM
Share

राजकीय वर्तुळातून दुःखद बातमी आली आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन झाले आहे. कानपूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते कानपूरमधून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. तसेच त्यांनी 10 वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. पोखरपूर येथील निवासस्थानी त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली.

श्रीप्रकाश जयस्वाल यांनी कानपूरमध्ये काँग्रेसला बळ दिले, तसेच कानपूरमध्ये अनेक मोठे प्रकल्प आणले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जयस्वाल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केला. योगी म्हणाले की, ‘माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ राजकारणी श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली! मी प्रभू श्री राम यांना प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे आणि शोकाकुल कुटुंबाला हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती द्यावी.”

महापौर म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात

श्रीप्रकाश जयस्वाल यांचा जन्म कानपूर मध्ये झाला होता. 1967 साली त्यांनी माया राणी जयस्वाल यांच्याशी लग्न केले. श्रीप्रकाश यांना दोन मुले आणि एक मुलगी आहेत. जयस्वाल 1989 मध्ये कानपूर शहराचा महापौर म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. कालांतराने ते राष्ट्रीय राजकारणात उतरले. 2000 ते 2002 ते उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी पक्षाचा विस्तार करण्याचे काम केले.

UPA 1 आणि 2 कार्यकाळात मंत्री

2004 साली स्थापन झालेल्या UPA 1 सरकारमध्ये श्रीप्रकाश जयस्वाल यांच्याकडे गृह राज्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली होती. 23 मे 2004 ते 22 मे 2009 या काळात ते या पदावर होते. मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांनी अंतर्गत सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था आणि गृह मंत्रालयाशी संबंधित इतरही जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यानंतर 19 जानेवारी 2011 ते 26 मे 2014 पर्यंत युपीए 2 च्या काळात ते कोळसा मंत्री होते. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय?  काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी  म्हणाल्या की...

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !